
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ''च्या भाषा विभागाने '' या शब्दाला २०२०चा हिंदी भाषेच्या विशेष शब्दाचा मान दिला आहे. भाषातज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या समितीने या शब्दाची निवड केली. वर्षभरात लोकांच्या भावना, मानसिकता प्रतिबंबित करणाऱ्या, सांस्कृतिक महत्त्व सांगणाऱ्या शब्दाची आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या शब्दाची '' म्हणून निवड केली जाते. यांनी च्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पॅकेजची घोषणा करताना अर्थव्यवस्था, समाज आणि वैयक्तिक पातळीवर आत्मनिर्भर होण्याच्या मुद्द्यावर जोर दिला होता. त्यानंतरच देशभरात सार्वजनिक पातळीवर 'आत्मनिर्भर भारत' या शब्दाचा वापर वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे कोविड १९च्या लशीची देशात झालेली निर्मिती. याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये बायोटेक्नॉलॉजी विभागाचा ' मोहिमे'चे महत्त्व सांगणारा आणि लसीकरणाची माहिती देणारा रथही राजपथावर होता. आत्मनिर्भर भारत या शब्दाला विविध पातळीवर वेगळी ओळख मिळाली. तसेच आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी तो शब्द हत्यार झाला होतो, असे 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन व्यंकटेश्वरन यांनी सांगितले. यापूर्वी २०१७मध्ये 'आधार', २०१८मध्ये 'नारीशक्ती', २०१९मध्ये 'संविधान' या शब्दाची निवड करण्यात आली होती.