राजधानीत महिला आयोगानं रोखला अल्पवयीन मुलीचा निकाह - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

राजधानीत महिला आयोगानं रोखला अल्पवयीन मुलीचा निकाह

https://ift.tt/3s0Eih6
नवी दिल्ली : देशात कायद्यानं रोखले असले तरी बालविवाहाची प्रथा ही अजूनही सामाजिक समस्या आहे. राजधानी दिल्लीत करून एका १५ वर्षीय मुलीच्या निकाहाचा घाट घालण्यात आला होता. परंतु, महिला आयोगाच्या सतर्कतेमुळे हा निकाह रोखण्यात आला. हा विवाह रोखण्यासाठी खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. संबंधित अल्पवयीन मुलगी केवळ १५ वर्षांची असूनही तिच्या विवाहाची तयारी करण्यात आली होती. यासाठी तिचं धर्मांतरही करण्यात येणार होते. 'मी आणि माझ्या टीमनं या भागात पोलीस अधिकाऱ्यांसोबत हा निकाह रोखला. देशातून बालविवाहाची प्रथा संपुष्टात येण्याचं नावच घेत नाही. मुलांकडून त्यांचं बालपण हिरावून घेणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी' असं ट्विट यांनी केलंय. कायदेशीररित्या विवाहासाठी मुलीचं वय १८ वर्ष आणि मुलाचं वय २१ वर्ष असणं गरजेचं आहे. उल्लेखनीय म्हणजे, करोना संक्रमण काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आणि सरकारी निर्बंधांमुळे अत्यंत कमी खर्चात लग्न उरकली जात आहेत. परंतु, याचमुळे अनेक ठिकाणी बालविवाहाचे प्रकार सर्रासपणे उघड होत आहेत. असंच एक प्रकरण गेल्या वर्षी दिल्लीच्या कल्याणपुरी भागातूनही समोर आलं होतं. या प्रकरणात एका १६ वर्षीय मुलीचा विवाह जबरदस्तीनं करण्याचा प्रयत्न केला जात होता. दिल्ली महिला आयोगाकडे आलेल्या एका अज्ञात कॉलमुळे या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीनं हा विवाह रोखला होता.