अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात आज (शनिवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाचवी आणि अखेरची टी-२० लढत होणार आहे. दोन्ही संघांनी मालिकेत प्रत्येकी २ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे या सामन्याला फायनलचे स्वरुप आले आहे. वाचा- ... पाचव्या टी-२० सामन्याआधी इंग्लंडसाठी एक वाइट बातमी आली आहे. इंग्लंड संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने दंड केला आहे. भारताविरुद्ध झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने आयसीसीने इंग्लंडच्या खेळाडूंना त्याच्या मॅच फीच्या २० टक्के इतका दंड केला आहे. वाचा- इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाने नियोजित वेळेत एक षटक कमी टाकले. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एलीट पॅनलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी इंग्लंड संघातील कर्णधारासह सर्व खेळाडूंना हा दंड केला आहे. आयसीसीचा नियम २.२२ नुसार इंग्लंड संघाने धीम्यागतीने ओव्हर टाकले. ज्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला मॅच फीच्या २० टक्के इतका दंड करण्यात आला आहे. वाचा- इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने आयसीसीने केलेला हा दंड स्वीकारला. त्यामुळे या प्रकरणी सुनावणीची गरज लागली नाही. मैदानावरील अंपायर केएन अनंतपद्मनाभन, नितिन मेनन आणि तिसरे अंपायर विरेंद्र शर्मा यांनी हा दंड केला होता. वाचा- या मालिकेत भारतीय संघाला दुसऱ्या टी-२० सामन्यात दंड झाला होता. तेव्हा देखील संघातील सर्व खेळाडूंना २० टक्के इतका दंड करण्यात आला होता. टी-२० मध्ये अनेकदा असे होते की संघांना धीम्या गतीने ओव्हर टाकल्याबद्दल दंड होतो. विशेषत: ज्या संघात जलद गोलंदाज अधिक असतात त्या संघांना याचा फटका बसतो. इंग्लंडबाबत देखील हेच घडले आहे. इंग्लंड संघात फक्त एकच फिरकीपटू आहे.