BCCIची आज हायव्होल्टेज बैठक; आयपीएलसह या गोष्टींचे भवितव्य ठरणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 29, 2021

BCCIची आज हायव्होल्टेज बैठक; आयपीएलसह या गोष्टींचे भवितव्य ठरणार

https://ift.tt/3p1NLEi
मुंबई: अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आज शनिवारी महत्त्वाची बैठक आहे. करोनामुळे ही बैठक ऑनलाइन होणार आहे. या बैठकीत आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरीत लढती कधी खेळवायच्या यासह अन्य अनेक महत्त्वाच्या विषयांवर बीसीसीआय निर्णय घेणार आहे. वाचा- करोनामुळे बीसीसीआयने २९ लढतीनंतर आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित केला होता. आता उर्वरित ३१ लढती कधी, कुठे आणि केव्हा घ्यायच्या याबाबत बीसीसीआयला निर्णय घ्यायचा आहे. आज होणाऱ्या बैठकीत आयपीएलसह टी-२० वर्ल्डकपचा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. या शिवाय रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यातील क्रिकेटपटूंना द्यावयाची रक्कम याबाबत देखील बीसीसीआयला निर्णय घ्यावा लागले. बीसीसीआयला या वर्षाच्या अखेरीस होणारा भारतात आयोजित करायचा आहे. तर आयपीएलच्या उर्वरित लढती युएईमध्ये खेळवायच्या आहेत. आज बीसीसीआयची बैठक होणार आहे तर एक जून रोजी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक होणार आहे. आयसीसीने टी-२० वर्ल्डकप बाबत कोणताही निर्णय घेण्याआधी भारतातील करोना परिस्थितीचा आढावा घ्यावा असे बीसीसीआय सांगू शकते. वाचा- बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत आणि तेच या बैठकीचे अध्यक्ष देखील असतील. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बैठकीचा मुख्य अजेंडा आयपीएलचा उर्वरित कार्यक्रम हाच असेल. आम्ही प्ले ऑफच्या चार लढती आणि १० डबल हेडर आणि सात सिंगल हेडर सामने खेळवण्याचा विचार करत आहोत. या बैठकीत आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकपशिवाय देशांतर्गत खेळाडूंशी संबंधित देखील एक महत्त्वाचा मुद्द आहे. करोनामुळे रद्द करण्यात आलेल्या रणजी स्पर्धेमुळे ७०० खेळाडूंचे नुकसान झाले. बीसीसीआयने जानेवारी महिन्यात खेळाडूंना आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले होते. पण त्याचे तपशील दिले नव्हते. वाचा- देशांतर्गत क्रिकेट खेळणााऱ्या खेळाडूपैकी फक्त ७३ क्रिकेटपटू आयपीएल खेळतात. फक्त विजय हजारे आणि सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळल्याने त्यांची आर्थिक गरज पूर्ण होणार नाही, असे एका राज्य संघटनेच्या अधिकाऱ्याने सांगितले.