अभिनेत्री रुचिता जाधवचं शुभमंगल! लग्नातही जपलं सामाजिक भान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 5, 2021

अभिनेत्री रुचिता जाधवचं शुभमंगल! लग्नातही जपलं सामाजिक भान

https://ift.tt/2SsVaQT
मुंबई : 'लव लग्न लोचा' आणि 'चिंतामणी' सिनेमातील अभिनेत्री हिने उद्योगपती यांच्याशी पाचगणी येथे लग्न केले. ३ मे रोजी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. आपल्या भावी आयुष्याबद्दल सांगताना रुचिता म्हणाली की, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता.' 'बंगल्यामध्ये तीन दिवस विवाह सोहळा पार पडला. पहिल्या दिवशी साखरपुडा आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला. २०१३ मध्ये एक अंगठी मला खूप आवडली होती. त्याची माहिती माझ्या मैत्रिणींनी आनंदला दिली आणि त्याने अगदी तशीच अंगठी माझ्यासाठी तयार करून घेतली. ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच खास होती. खरे तर या बंगल्याच्या बाहेरच्या आवारात लग्नसोहळा होणार होता. परंतु अचानक पाऊस आल्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला आतमध्ये करावा लागला.' रुचिता आणि आनंदच्या लग्नसोहळ्यामध्ये संगीत कार्यक्रम देखील होणार होता. परंतु त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. त्याऐवजी त्यांनी डाळ आणि तांदुळाची १५०० पाकीटे पाचगणीच्या परिसरात असलेल्या खेड्यांमध्ये वाटली. त्याबाबत रुचिताने सांगितले, ' किमान इतकी तरी मदत आम्ही नक्कीच करू शकणार होतो. त्यामुळे आम्ही या गावात जाऊन प्रत्येक व्यक्तीला अडीच किलो तांदूळ आणि अडीच किलो डाळ वाटली. अशा प्रकारे आम्ही आमचा संगीत सोहळा साजरा केला.'