आरटीओतही मनी लाँड्रिंग; परिवहनमंत्र्यावर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 29, 2021

आरटीओतही मनी लाँड्रिंग; परिवहनमंत्र्यावर आरोप

https://ift.tt/3uyFIzM
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र पोलिसांपाठोपाठ आता प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आरटीओतील वाहन निरीक्षकानेच परिवहनमंत्र्यासह राज्यातील सहा बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली असून, या प्रकरणाची शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. राज्यातील अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गंभीर आरोपांची मालिका आता सुरू झाली असून, त्यात नाशिकचाही समावेश झाला आहे. सध्या नाशिकमध्ये नियुक्ती असलेल्या गजेंद्र पाटील या मोटार वाहन निरीक्षकाने आरटीओतील गैरव्यवहार प्रकरणी थेट पंचवटी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. धुळे येथे कार्यरत असताना निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेलेल्या पाटील यांना सध्या नाशिक मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मेलवर आणि नंतर प्रत्यक्ष हजर होत, आरटीओमध्ये बदलीच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांचे होत असल्याचा आरोप केला. काय आहेत आरोप? आरटीओमध्ये सध्या बदल्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतात. परिवहन आयुक्तालय हे मुख्य केंद्र असून, संकलित झालेल्या काळ्या पैशांमध्ये थेट परिवहनमंत्र्याचा संबंध असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याशिवाय नाशिकसह मुंबईतील सहा मोठ्या अधिकाऱ्यांचा उल्लेख तक्रार अर्जामध्ये करण्यात आला आहे. संघटित पद्धतीने चेकपोस्टवर बदल्या होतात. बीएस फोर या बंद पडलेल्या वाहनांची नोंदणी केली जाते, वाहतूकदारांना हाताशी धरून बसेस, तसेच मालट्रक पास होतात. यात मोठा काळा पैसा निर्माण होतो. याशिवाय इतर अनेक गंभीर आरोप संबंधित वाहन निरीक्षकाने केले आहेत. पोलिसांची भूमिका ई-मेल आणि प्रत्यक्षात आलेल्या या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी वाहन निरीक्षक पाटील यांना चौकशीकामी हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, ते अद्याप हजर झालेले नाहीत. तक्रार अर्जातील आरोप गंभीर असल्याने ही चौकशी क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यासंबधी लवकरच जाबजबाब नोंदवण्यात येतील, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.