IPL ची सर्वात मोठी अपडेट: स्पर्धा शिफ्ट होणार या शहरात, वेळापत्रकात होणार मोठे बदल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 4, 2021

IPL ची सर्वात मोठी अपडेट: स्पर्धा शिफ्ट होणार या शहरात, वेळापत्रकात होणार मोठे बदल

https://ift.tt/3umEBUI
मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात सध्या दिल्ली आणि अहमदाबाद येथे सामने होत आहेत. या दोन शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात हे निर्णय होऊ शकतात. कोलकाता संघातील दोघा खेळाडूंना कोरनाची लागण झाल्याने काल सोमवारी होणारी लढत पुढे ढकलण्यात आली. आता बीसीसीआयकडून संपूर्ण स्पर्धा मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार सुरू आहे. या आठवड्यात हा बदल केला जाऊ शकतो. बीसीसीआयने असा निर्णय घेतला तर आयपीएलच्या वेळापत्रकात मोठे बदल करावे लागू शकतात. याचा अर्थ डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने)चे प्रमाण वाढू शकते. याच बरोबर आयपीएलची फायनल जी ३० मे रोजी होणार होती ती देखील जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. जर मुंबईत शिफ्ट करायचे असेल तर बीसीसीआयला बायो बबल तयार करण्याचे मोठे आव्हान असेल. आठ संघांसाठी हॉटेल शोधने, स्टेडियम तयार करणे आदी गोष्टींचा त्याच समावेश होतो. मुंबईत एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे येथे तीन स्टेडियम आहेत. वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्राबोन होय. या मैदानांचा वापर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता. वानखेडे मैदानावर एप्रिल महिन्यात आयपीएलच्या लढती झाल्या होत्या. तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि अन्य दोन मैदानाचा वापर सराव करण्यासाठी करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने मुंबईतील अनेक हॉटलना फोन करून बायो बबल करण्याची त्यांची क्षमता आहे का याची विचारणा केली होती. याचा अर्थ आधीच्या योजनेनुसार दोन मैदानावर स्पर्धे घेऊ शकते. यात मुंबईला स्पर्धेचे मुख्य स्थळ मानले जाईल. प्रवासाचा धोका आयपीएलच्या पुढील सत्रात बेंगळुरू आणि कोलकाता या शहरात सामने होणार आहेत. करोनामुळे भारतात परिस्थिती बिघडत चालली आहे. आयपीएलच्या बायो बबलमध्ये करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संघ चालक, खेळाडू आणि बीसीसीआयचे अधिकारी देखील प्रवासातील धोका बोलून दाखवत आहेत. आयपीएलच्या सुरुवातीला मुंबईतील परिस्थिती फारच खराब होती. पण आता मुंबईतील करोना स्थितीत सुधारणा झाली आहे. सोमवारी मुंबईत २ हजार ६६२ रुग्ण आढळले होते. १७ मार्चनंतर ही सर्वात कमी संख्या आहे. तर १४ एप्रिल रोजी मुंबईत ११ हजार १६३ रुग्ण आढळले होते.