ममतांनी सोनियांची भेट घेतली; म्हणाल्या, 'विरोधी पक्षाचा नेता कोण? हे...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 29, 2021

ममतांनी सोनियांची भेट घेतली; म्हणाल्या, 'विरोधी पक्षाचा नेता कोण? हे...'

https://ift.tt/2USqOZI
नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( meets ) या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. ममतांनी ( mamata banerjee ) आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष ( sonia gandhi ) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राहुल गांधीही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर ( ) यांची ममता बॅनर्जी उद्या भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्याला चहापाण्यासाठी बोलावले होते. राहुल गांधीही यावेळी उपस्थित होते. राजकीय स्थिती, पेगासस आणि करोनाच्या स्थितीसह विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या मुद्द्यावर चर्चा केली. आमच्यात चांगली चर्चा झाली. भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. विरोधकांच्या एकजुटीबाबत ममतांना प्रश्न विचारण्यात आला. विरोधी पक्षांनी एकजूट व्हावं, हे सोनिया गांधींचेही विचार आहेत. यामुळे काँग्रेसला प्रादेशिक पक्षांवर आणि प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. भाजप हा बळकट पक्ष आहे. विरोधी पक्षांना त्याहून अधिक भक्कम होणं गरजेचं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष इतिहास रचेल, अशी अपेक्षा ममतांनी व्यक्त केली. मी एकटी काही करू शकत नाही, सर्व विरोधकांनी एकत्र आलं पाहिजेः ममता २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात विरोधी पक्षाचं नेतृत्व कोण करेल? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना करण्यात आला. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होणं आवश्यक आहे. मी एकटी काहीच करू शकत नाही. सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. मी काही ज्योतिषी नाही. मला कुणाचा चेहराही थोपायचा नाही. हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असं ममतांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षांकडून दुसरा चेहरा ही समोर आला तरी आपल्याला कुठलाही आक्षेप नाही. यामुद्द्यावर चर्चा होईल, तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. मला नेता व्हायचं नाहीए, तर कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 'पेगाससर सरकार उत्तर का देत नाहीए?' पेगासस हेरगिरी प्रकरणी ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पेगासस प्रकरणी सरकार उत्तर का देत नाहीए? जनतेला हे कळायलाच हवं. धोरणात्मक निर्णय हे संसदेत घेतली जात नसतील, मग तिथे चर्चा होणार नाही तर कुठे होईल? ही चर्चा चहाच्या टपरीवर होणार होऊ शकत नाही. ही चर्चा संसेदच होते, असा टोला ममता बॅनर्जींनी लगावला. केंद्र सरकारचा विरोध केल्यावर संबंधितांवर कारवाई होते. खरं तर त्यांच्याकडेच काळा पैसा आहे, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. केजरीवाल ममतांना भेटले दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. केजरीवाल यांनी टीएमसीचे खासदार आणि ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी ममतांची भेट घेतली. यानंतर ममता बॅनर्जी या शरद पवार यांची उद्या भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.