होय, भारतासोबत गुप्त बैठक झाली; पाकिस्तानचा मोठा खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 25, 2021

होय, भारतासोबत गुप्त बैठक झाली; पाकिस्तानचा मोठा खुलासा

https://ift.tt/3i4g03u
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये पडद्यामागे चर्चा झाली असल्याचे म्हटले जात होते. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी भारतासोबतच्या बैठकींबाबत खुलासा केला आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतासोबत अनेक गुप्त बैठकी झाल्याचे त्यांनी म्हटले. भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होण्यासाठीची आशा अद्यापही मावळली नाही. त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी तयार झाले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. वृत्तसंकेतस्थळ 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुईद युसुफ यांनी म्हटले की, वर्ष २००३ नंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा शस्त्रसंधी लागू झाली. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होण्याची आशा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली गुप्त बैठक ही २००३ प्रमाणे शस्त्रसंधी लागू करण्यासाठी होती, असेही युसूफ यांनी म्हटले. ही बैठक कुठे झाली, याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. वाचा: युसूफ यांनी म्हटले की, दोन्ही देशांमध्ये एकापेक्षा अधिक बैठका पार पडू शकत होत्या. प्रत्यक्ष अथवा व्हर्च्युअल बैठका होऊ शकल्या असत्या. या बैठकीत भारताकडून आणि पाकिस्तानकडून कोणते अधिकारी सहभागी झाले होते, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. या बैठकीत आयएसआय प्रमुख सहभागी झाले होते का, हेही त्यांनी सांगितले. वाचा: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासोबत भेट झाली नसल्याचेही मोईद युसूफ यांनी म्हटले. डोवल यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख बाजवा यांच्यासोबत भेट घेतली का, या प्रश्नाचे उत्तर देण्यासही टाळाटाळ केली. संबंध सुरळीत होण्यासाठी भारताकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होणार असतील तर पाकिस्तानचीही तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया यासारख्या त्रयस्थ देशांकडून शस्त्रसंधीसाठी भूमिका बजावण्यात आली का, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी यासाठी भारतावर दबाव टाकण्यात आला असावा असेही त्यांनी म्हटले.