चौथ्या दिवशी हेडिंग्लेची खेळपट्टी बदलणार, जाणून घ्या काय होणार मोठा बदल... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 28, 2021

चौथ्या दिवशी हेडिंग्लेची खेळपट्टी बदलणार, जाणून घ्या काय होणार मोठा बदल...

https://ift.tt/3Bkps9q
हेडिंग्ले : कसोटीचा तिसरा दिवस भारताच्या फलंदाजांनी गाजवला. पण या सामन्याच्या चौथ दिवस महत्वाचा ठरणार आहे. कारण चौथ्या दिवशी खेळपट्टीमध्ये मोठा बदल होणार आहे. खेळपट्टीमध्ये नेमका कोणता बदल होणार, जाणून घ्या...पहिल्या दिवशी या खेळपट्टीवर भारताचा पहिला डाव ७८ धावांत आटोपला. पण त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी केली, तर तिसरा दिवस भारताच्या फलंदाजांनी गाजवला. पण चौथ्या दिवशी आता खेळपट्टीमध्ये मोठा बदल होणार आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसापासून खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अधिक चांगली होणार आहे. त्यामुळे भारताच्या पथ्यावर ही गोष्ट पडणार आहे. त्याचबरोबर सामन्याच्या चौथ्या दिवसापासून खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. पण चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांना एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे त्यांना चौथ्या दिवसाचा पहिला तास संयमीपणे खेळावा लागेल. जर भारतीय संघाने पहिल्या तासात एकही विकेट गमावली नाही तर दिवसभर या खेळपट्टीवर ते मोठी धावसंख्या उभारू शकतात. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाचा आशा यावेळी पल्लवित झाल्या आहेत. तिसरा दिवस भारताने कसा गाजवला, पाहा...भारतीय संघाला दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारता आली. तिसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद २१५ अशी मजल मारली असून ते अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहेत. रोहित आणि पुजारा या दोघांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाला चांगली धावसंख्या रचून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. पण रोहित शर्मा यावेळी दुर्देवी ठरला. रोहितने दमदार अर्धशतक साजरे केले, पण रोहितला यावेळी ५९ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. पुजारा यावेळी नाबाद ९१ धावांवर खेळत आहे, पुजाराने ९१ धावांची खेळी साकारताना १५ चौकार फटकावले आहेत. कोहली यावेळी नाबाद ४५ धावांवर खेळत असून त्याच्या नावावर सहा चौकार आहेत. त्यामुळे ही जोडी आता उद्या किती धावा जमवते, यावर भारतीय संघाचे या कसोटीतील भवितव्य अवलंबून असेल.