नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी लीड्स मैदानावर होणार आहे. ही लढत २५ ऑगस्टपासून सुरू होईल. भारताने दुसऱ्या लढतीत विजय मिळून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या लढतीत भारताच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. नॉटिंघम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती पण पावसामुळे सामना ड्रॉ झाला. तर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताने इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे लक्ष्य दिले होते. पण त्यांचा डावा १२० धावात संपुष्ठात आला आणि भारताने १५१ धावांनी विजय मिळवला. मालिकेती तिसरी लढत आता लीड्सवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात एक बदल होऊ शकतो. मालिकेतील पहिल्या दोन्ही लढतीत आर अश्विनला संधी मिळाली नव्हती. संघात असलेला मुख्य फिरकीपटू फार चांगली कामगिरी करू शकरा नाही. पहिल्या कसोटीत त्याने १६ षटके गोलंदाजी केली पण एकही विकेट मिळवता आली नाही. दुसऱ्या कसोटीत त्याने २८ षटके गोलंदाजी केली तरी त्याला विकेट मिळाली नाही. मालिकेत ४४ षटकात त्याने ९८ धावा दिल्या पण एकही विकटे घेतली नाही. इंग्लंड संघाने लॉर्ड्स कसोटीत मोईन अलीला संधी दिली होती आणि त्याने ३ विकेट घेतल्या. मोईन अली जडेजापेक्षा प्रभावी ठरला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी अश्विनला संधी मिळू शकते. तो मुख्य फिरकीपटू आहे आणइ न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता.