सणासुदीला गृहिणींना दिलासा मिळणार; खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 23, 2021

सणासुदीला गृहिणींना दिलासा मिळणार; खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता?

https://ift.tt/3gnSpJQ
म. टा. प्रतिनिधी, केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. तेलाची सर्वाधिक आयात मुंबईतील बंदरांवर होते. भारताला एकूण गरजेच्या जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. या ७० टक्क्यांपैकी ५५ ते ६० टक्के खाद्यतेल हे पामतेल असते. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत करोना संकटामुळे पामतेलाच्या आयातीत घट झाली होती. त्याचवेळी घरगुती क्षेत्राकडून मागणी असलेल्या सूर्यफुलाच्या तेलाच्या आयातीतदेखील घट झाली. परिणामी अन्य खाद्यतेले महाग झाली आहेत. आता मात्र त्या दरांमध्ये घट होण्याची आशा निर्माण झाली आहे. अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, 'भारतात दरवर्षी ६० ते ७० हजार कोटी रुपये खर्च करून दीड कोटी टन खाद्यतेल आयात केले जाते. केंद्र सरकारने सोयाबीन व सूर्यफुलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून साडे सात टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे आता हा खर्च ३० ते ३५ हजार कोटी रुपयांवर येणार आहे. यामुळे येत्या १५ दिवसांत खाद्यतेलाचे दर कमी होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळ सणांचा असल्याने हा मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे.' खाद्यतेलाचे भारतातील उत्पादन ७० ते ८० लाख टन आहे. पण मागणी अडीच कोटी टनांच्या घरांत आहे. त्यामुळेच किमान दीड कोटी टन खाद्यतेल आयात करावे लागते. यापैकी ७२ टन पामतेलाची आयात मलेशिया व इंडोनेशियाहून होते. ३४ लाख सोयबीन तेलाची आयात ब्राझिल व अर्जेंटिनाहून होते. तर २५ लाख टन सूर्यफुल तेलाची आयात रशिया आणि युक्रेनहून होते. एकूण आयातीपैकी ४० टक्के आयात ही मुंबईतील बंदरांवर होते, असे ठक्कर यांनी सांगितले. खाद्यतेलाचे दर (रुपये/लिटर) प्रकार एप्रिल सध्या शुल्क कपातीनंतरचे दर पाम १२५-१३० १२०-१२५ ११०-११५ सोयाबीन १६०-१७५ १४५-१५५ १३०-१३५ सूर्यफूल १६५-१८५ १५०-१७० १३०-१४० शेंगदाणा १९५-२२५ १७५-२१५ १६५-१९५ राईसब्रान १५५-१६५ १४०-१६० १३०-१४०