मुंबईच्या चाकरमान्यांना दिलासा; कोकणचा रेल्वेप्रवास अधिक सुखकर होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 31, 2021

मुंबईच्या चाकरमान्यांना दिलासा; कोकणचा रेल्वेप्रवास अधिक सुखकर होणार

https://ift.tt/3kyr5cW
म. टा. प्रतिनिधी, मध्य आणि कोकण रेल्वेवरील 'बॉटल नेक' म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहा ते वीरदरम्यान रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या कामामुळे क्रॉसिंगमुळे होणारी गाड्यांची रखडपट्टी टळणार आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. रोहा ते वीर या रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. २०१७पासून ते हाती घेण्यात आले होते. ४६.७ किमीचे हे काम असून, आतापर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्त निधी यासाठी खर्च झालेली आहे. करोनाकाळात कामाचा वेग मंदावला होता. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्सव विशेष गाड्यांव्यतिरिक्त मेल-एक्स्प्रेस, मालगाड्यांची वाहतूक मध्य आणि कोकण रेल्वेदरम्यान मोठ्या प्रमाणात होते. अनेकदा मालगाडीसाठी मेल-एक्स्प्रेस किंवा पॅसेंजरला 'साइड ट्रॅक' वर टाकण्यात येत असे. या दुहेरीकरणामुळे ही रखडपट्टी टळणार आहे. त्याचबरोबर सिग्नल, पॉइंट आणि अन्य तांत्रिक कामे करण्यात आल्याने कोकणवासीयांचा प्रवास आता सुखकर होणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मुंबई ते कोकण पोहोचायचा प्रश्न मिटवला असला तरी रेल्वे स्थानक ते घर, या वाटेत कडक नियमांचे काटे आहेत. ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, मंत्री या यंत्रणांमधील अस्पष्ट नियमांमुळे गणेशभक्तांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापाठोपाठ रत्नागिरीनेही जिल्हा प्रवेशासाठी आरटीपीसीआर किंवा लशीच्या दोन मात्रांचे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. यामुळे जिल्ह्यामधील लाखो मुंबईकरांसमोर नवा पेच उभा राहिला आहे. ... 'आरटीओ' सध्या काय करतंय ? रेल्वे-एसटीपाठोपाठ खासगी बसला मोठी मागणी आहे. कालावधीतील मागणी लक्षात घेता सुरक्षानियम धाब्यावर बसवून खासगी बसचालक वाहतूक करतात. त्यांना रोखण्यासाठी परिवहन नेमकी कशी तयारी करणार, वाढीव दरांवरून सर्वसामान्यांची होणाऱ्या आर्थिक लुटीवर जरब कशी बसवणार, याबाबत अद्याप कोणतीही तयारी दिसत नाही. यामुळे आरटीओ काय करतेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.