कोळसा संकट कायम; साठ्यात दोन टक्क्यांची वाढ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

कोळसा संकट कायम; साठ्यात दोन टक्क्यांची वाढ

https://ift.tt/3jikrYA
म. टा. प्रतिनिधी, राज्य सरकारी महानिर्मितीसमोरील संकट कायम आहे. मंगळवारच्या वीज उत्पादनासाठी उपलब्ध कोळशाचा साठा १.३८ लाख टनांवरून किंचित वाढून १.४६ लाख टनांवर पोहोचला. परिणामी कंपनीची अद्यापही ४८०० मेगावॉटदरम्यान कायम आहे. केंद्रीय कोळसा मंत्रालयाशी चर्चा झाल्यानंतर महानिर्मितीकडील कोळसा साठा २.१६ लाख टनांवर गेला होता. पण तीन दिवसांपासून त्यात घसरण सुरू आहे. १.९१ लाख टनांवरून हा साठा सोमवारी १.३८ लाख टनांवर आला होता. सुदैवाने मंगळवारी त्यात किंचित वाढ झाली. तरीही हा साठा कमीच आहे. मंगळवारी उपलब्ध असलेल्या कोळसासाठ्यापैकी फक्त २५ हजार १४९ टन कोळसा हा वीज निर्मितीयोग्य होता. तर उर्वरित कोळसा धुण्याच्या प्रक्रियेत होता. कोळसा टंचाईवर काही प्रमाणात मात करीत 'महानिर्मिती' कंपनीची औष्णिक वीज निर्मिती ५८०० मेगावॉटवर पोहोचली होती. पण त्यानंतर ही वीज निर्मिती ४८०० मेगावॉटपर्यंत घसरली आहे. सोमवार व मंगळवार अशा सलग दोन दिवशी इतकीच वीजनिर्मिती कंपनी करू शकली. मंगळवारी सर्वाधिक ७० हजार ७५१ टन कोळसा साठा चंद्रपूर येथील वीज प्रकल्पात होता. तर सर्वांत कमी म्हणजे ५६६४ टन कोळसा साठा नाशिकच्या प्रकल्पात होता.