अमरावती शहरात पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश; प्रशासनाचा मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 22, 2021

अमरावती शहरात पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश; प्रशासनाचा मोठा निर्णय

https://ift.tt/3qYOEjZ
अमरावतीः त्रिपुरा येथील कथित हिंसाचारानंतर अमरावती शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी हिंसाचार घडला होता याच पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अमरावती शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. रविवारी भारतीय जनता पक्षानं राज्यभर धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिले आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी अपघातग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. तसंच, भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपकडून राज्य व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लिम समुदायांना पाच टक्के आरक्षण द्यावे यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडले होते. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता अमरावती शहरात पुन्हा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी जमा झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी दिली. दरम्यान आज शहरातील बाजार पेठ सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हा सुधारित आदेश जारी केला आहे. हिंसाचारानंतर अमरावती शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता शहरात कलम १४४ लागू करत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. अमरावती शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन काही वेळा करता संचारबंदी मध्ये शिथीलता देत. जीवनावश्यक वस्तू कृषी केंद्र विद्यार्थी बँक सरकारी कार्यालय यांना काही वेळा करिता सूट देण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावतीकरांना शुक्रवारी दुपारपासून इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आली आहे. याच पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण होईल कुणाच्या भावना दुखावल्या जातील व चुकीची माहिती समाजात जाईल, अशा प्रकारचे संदेश फॉरवर्ड करू नये असे आदेश देण्यात आले आहे. फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर सायबर विभाग लक्ष ठेवून असून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.