विराट कोहलीने कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारपदही सोडायला हवे; शाहिद आफ्रिदीचा अजब सल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 16, 2021

विराट कोहलीने कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारपदही सोडायला हवे; शाहिद आफ्रिदीचा अजब सल्ला

https://ift.tt/3DjoxaF
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि तडाखेबंद फलंदाज शाहिद आफ्रिदीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कौतुक केले आहे. या निर्णयाची आपल्याला आधीपासूनच कल्पना होती, असेही त्याने सांगितले. रोहित टी-२० संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर या क्रिकेट प्रकाराचे कर्णधारपद सोडले आहे. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिका सुरू होणार असून आता रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. जशी वेळ तसं वर्तन समा टीव्हीशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, 'रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणारच होता. मी त्याच्यासोबत डेक्कन चार्जर्समध्ये एक वर्ष खेळलो आहे. तो एक हुशार खेळाडू आहे. त्याची शॉटची निवड अप्रतिम आहे. गरज असेल तेव्हा तो शांत, गरज असेल तेव्हा तो आक्रमक होत असतो. सामन्यामध्ये त्यांची दोन्ही रूपे बघायला मिळतात. कर्णधारपदात हा बदल व्हायला हवा होता. त्याला नक्कीच संधी द्यायला पाहिजे. एकीकडे रोहितचे कौतुक झाल्यानंतर दुसरीकडे आफ्रिदीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद कोहलीने सोडून द्यावे, असे म्हटले आहे. कर्णधारपद सोडून कोहलीने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावे, असेही त्याने सांगितले. विराटने सर्व क्रिकेट प्रकारातून कर्णधारपद सोडावे आफ्रिदी म्हणाला की, 'मला वाटते की, आता विराट कोहलीने तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळत राहील, याबाबत निर्णय घ्यावा. त्यामुळे त्याच्यावर तुलनेने कमी दबाव येईल. तो भरपूर क्रिकेट खेळला आहे. यापुढे त्याला क्रिकेटचा आणि त्याच्या फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेता येईल, कारण संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. विशेषतः भारत आणि पाकिस्तान या दोन संघांसाठी ही खूप कठीण गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही चांगले कर्णधार आहात, तोपर्यंत सर्व काही ठीक असते. विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. यासोबतच त्याचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधारपदाची आकडेवारीही चांगली आहे.