हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती; आतापर्यंत केवळ तीनच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 10, 2021

हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती; आतापर्यंत केवळ तीनच...

https://ift.tt/3IE5A5B
नवी दिल्ली: कुन्नूर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल , त्यांची पत्नी यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह आज तामिळनाडूतून दिल्लीत आणले असतानाच एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या १३ मृतदेहांपैकी केवळ तीन मृतदेहांचीच ओळख आतापर्यंत पटली असून बाकी मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. ( ) वाचा: तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाच्या एमआय-१७ व्ही ५ या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. दाट जंगलात हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी व अन्य अधिकारी आणि क्रू मेंबर्स अशा १३ जणांचा मृत्यू झाला. या सर्वांचे पार्थिव वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. हे सर्व पार्थिव आज भारतीय हवाई दलाच्या विमानाने सुलूर एअरबेस येथून दिल्लीत आणण्यात आले आहेत. पंतप्रधान यांनी पालम एअरबेस येथे जाऊन रावत व अन्य मृतांना श्रद्धांजली वाहिली. हा सगळा घटनाक्रम सुरू असतानाच मृतदेहांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाचा: तामिळनाडूतून सर्व १३ मृतदेह दिल्लीत आणण्यात आले असले तरी त्यापैकी बिपीन रावत, मधुलिका रावत आणि ब्रिगेडियर अशा तीन जणांचीच ओळख आतापर्यंत पटू शकली असून बाकी मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सध्या तरी ज्या तीन मृतदेहांची ओळख पटली आहे तेच मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले जातील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. बाकी मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत बाकी सर्व मृतदेह एअरबेसवरील रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात येतील, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. मृतदेाहांची ओळख पटवण्यासाठी संबंधितांच्या नातेवाईकांची मदत घेतली जात आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. वाचा: दरम्यान, हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपीन रावत हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं. दुर्घटनेत रावत यांची पत्नी मधुलिका रावत तसेच रावत यांच्या स्टाफमधील ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हे दोन वरिष्ठ अधिकारी आणि विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान, स्क्वाड्रन लीडर के. सिंग, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर प्रदीप ए., ज्युनिअर वॉरंट ऑफिसर दास, सतपाल राय, नायक गुरुसेवक सिंग, जितेंद्रकुमार, लान्स नायक विवेककुमार, लान्स नायक साई तेजा यांचा मृत्यू झाला. यापैकी १० जणांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीचा भडका उडाला होता. त्यामुळे सर्वचजण गंभीररित्या भाजले होते. परिणामी मृतदेहांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाचा: