प्रियांका गांधी गोव्यात पोहचताच काँग्रेसला बसला 'हा' मोठा धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 11, 2021

प्रियांका गांधी गोव्यात पोहचताच काँग्रेसला बसला 'हा' मोठा धक्का

https://ift.tt/3EJGFvd
पणजी: देशातील पाच राज्यांत पुढील वर्षी सुरुवातीच्या तीन महिन्यांत निवडणुका होणार असून यातील उत्तर प्रदेश आणि या राज्यांत काँग्रेसने सरचिटणीस यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळेच ही दोन्ही राज्ये जिंकण्यासाठी प्रियांका यांनी कंबर कसली असून प्रियांका आज गोवा दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात प्रियांका यांच्या महत्त्वाच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले असतानाच दुसरीकडे पक्षात राजीनामासत्र पाहायला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ( ) वाचा: प्रियांका गांधी यांच्या गोवा दौऱ्याआधीपासूनच राज्यात काँग्रेसला जबर धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि आमदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गोव्याचे आणखी एक माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते प्रतापसिंह राणे हेसुद्धा भाजपात येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेश प्रभारी यांनी केला आहे. तसे झाल्यास काँग्रेस पक्षाचं राज्यातील संख्याबळ अवघं दोन इतकं राहणार आहे. पक्षासाठी हा मोठा धक्का असतानाच प्रियांका गांधी यांच्या गोवा दौऱ्यातही राजीनामासत्र पाहायला मिळालं. वाचा: प्रियांका गांधी आज गोव्यात दाखल झाल्या. त्यांनी मोरपिला गावाला भेट दिली. तिथे आदिवासींसोबत त्यांनी जेवण घेतले. यावेळी लोकनृत्यात सहभागी होतानाच शहाळ्याच्या पाण्याचाही त्यांनी आस्वाद घेतला. 'मांड' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर दाभोळी येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी गोव्यातील भाजप सरकारवर तोफ डागली. गोव्यातलं भाजप सरकार उद्योगपतींसाठी काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. एकीकडे प्रियांका या गोवेकरांपुढे काँग्रेसचा अजेंडा ठेवत साद घालत असताना दुसरीकडे काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील वरिष्ठ नेते यांनी पक्षाला रामराम ठोकला. पक्षविरोधी कारवाया करूनही कर्टोरिमचे विद्यमान आमदार अ‍ॅलेक्सो लॉरेंको यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याने नाराज होत रेबेलो यांनी बंड पुकारले. दुसरीकडे परवरी विधानसभा मतदारसंघातही पक्षाला धक्का बसला. येथील काँग्रेसचा एक गट गुपेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षातून बाहरे पडला. २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस गंभीर नाही. पक्षाकडे निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीच रणनीती नाही, असा आरोप करत या सर्वांनी अपक्ष आमदार रोहन खुंटे यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राज्यात समविचारी पक्षांसोबत आघाडीवरूनही अद्याप काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती असल्याचे पाहायला मिळाले आहे. वाचा: