
म. टा. प्रतिनिधी, येथील नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Sahitya Sammelan) उद्घाटन समारंभाला ‘ज्ञानपीठ’प्राप्त कोकणी साहित्यिक (Damodar Mauzo) यांना निमंत्रित करण्यावरुन सुरू झाला आहे. मावजो मराठीद्वेष्टे असून गोव्यात मराठीचा राजभाषा होण्याचा न्याय्य हक्क डावलला गेल्याची टीका गोमंतक मराठी अकादमीने केली आहे. मावजो यांचे निमंत्रण रद्द करा, अन्यथा संमेलन उधळून लावू, असा इशारा संस्थेने दिला आहे. यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने उदगीरच्या स्वागत मंडळाला योग्य निर्णय घेण्याबाबत सुचना केली आहे. (controversy has erupted over the invitation of konkani writer to the inaugural function of the akhil bhartiya marathi sahitya sammelan) क्लिक करा आणि वाचा- उदगीर येथील अखिल भारतीय मराठी आठवड्यावर येऊन ठेपले असताना वादाला तोंड फुटले आहे. संमेलनाच्या उद्घाटन समारंभास ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणावर गोमंतक मराठी अकादमीने आक्षेप घेतला आहे. गोव्यातील मराठीद्वेष्टे कोकणी लेखक दामोदर मावजो यांना आमंत्रित केल्याबद्दल समस्त गोमंतकीय मराठी भाषिकांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा जाहीर निषेध करीत असल्याचे प्रसिद्धीपत्रक गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी काढले आहे. ‘गोव्याची राजभाषा होण्याचा मराठीचा न्याय्य हक्क डावलून कोकणी राजभाषा करण्यात आली, हे वास्तव महाराष्ट्राला माहीत आहे. कर्नाटक जसे बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करते, तसाच अन्याय गोव्यातील मराठी भाषिकांवर सुरू आहे. दामोदर मावजो कट्टर कोकणीवादी आहेत. त्यांना मराठी साहित्य संमेलनात बोलावणे म्हणजे गोमंतकीय मराठीप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळणे आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निषेधार्ह निर्णय घेण्यापूर्वी गोमंतकीय मराठीप्रेमींशी चर्चा करायला हवी होती’, असे घाडी यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- गोमंतकीय मराठी भाषिकांना अपमानित करणारा हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा. नसता संमेलन उधळून लावण्यास आम्हाला उदगीरला यावे लागेल असा इशारा आमोणकर यांनी दिला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांनी गोव्यातील मराठीप्रेमींची पाठराखण करून महामंडळास आपली चूक सुधारण्यास भाग पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या वादावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी खुलासा केला आहे. ‘दामोदर मावजो यांना निमंत्रित करताना महामंडळाला विचारण्यात आले नाही. स्वागत मंडळाने ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यिकाला बोलावण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे. त्यामुळे मावजो मराठीद्वेष्टे आहेत किंवा नाहीत याची महामंडळाला कल्पना नव्हती. गोमंतक मराठी अकादमीच्या आक्षेपांबाबत स्वागत मंडळाला कळवले आहे. ते योग्य तो निर्णय घेतील’, असे ठाले यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-