चालकांच्या मनमानीला बसणार चाप? उबरने घेतला महत्त्वाचा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 21, 2022

चालकांच्या मनमानीला बसणार चाप? उबरने घेतला महत्त्वाचा निर्णय

https://ift.tt/5szfoB1
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अॅप बेस्ड टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर कंपनीने भाडे नाकारण्याबाबतच्या प्रवाशांच्या तक्रारीवर तंत्रज्ञानाच्या मदतीने तोडगा शोधला आहे. प्रवाशांना कुठे जायचे आहे आणि टॅक्सी भाडे रोखीने देणार की ऑनलाइन पद्धतीने याची माहिती गाडी आरक्षित करण्यापूर्वीच चालकांना देण्यात येणार आहे. यामुळे चालकांकडून भाडे नाकारण्याबाबतचा प्रवाशांचा त्रास कमी होऊन याचा फायदा चालक आणि प्रवासी या दोघांना होणार असल्याचा दावा 'उबर'ने केला आहे. शहर-उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अॅप टॅक्सी सेवा रोखीने तसेच ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने प्रवासी भाडे स्वीकारतात. अनेकदा चालकांना भाडे कोणत्या भागातील मिळणार याची माहिती नसते. यामुळे चालकांकडून भाडे रद्द केले जाते. चालकांना प्रवासी घेऊन कुठे जायचे याबाबत माहिती मिळत नसल्याने भाडे परस्पर चालकांकडून रद्द करण्यात येत होते. यावर उपाय म्हणून भाडे रोखीने आहे की ऑनलाइन याची माहिती चालकांना गाडी आरक्षित करण्यापूर्वीच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पर्यायामुळे भाडे नाकारण्याचा तक्रारी कमी होतील. त्याच बरोबर गाडी आरक्षित होण्यापूर्वी प्रवाशांना कुठे जायचे आहे त्याची माहितीही आता चालकांना उपलब्ध होणार आहे. याचा फायदा चालक आणि प्रवासी या दोघांना होईल, असे उबरच्या प्रवक्त्यांनी सांगितले. भाड्याच्या रकमेबाबतही निर्णय सध्या ही सुविधा २० शहरांत सुरू असून लवकरच अन्य शहरांत याचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. चालकांना दररोज पगार देण्यात येणार असून, सोमवार ते गुरुवारपर्यंतची कमाई दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी चालकांना देण्यात येईल. तर शुक्रवार ते रविवारची कमाई चालकांना सोमवारी देण्यात येणार आहे.