राज्यपालांच्या अभिभाषणावेळी बत्ती गुल, तिघांचे निलंबन, एकाची सेवा समाप्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 24, 2022

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी बत्ती गुल, तिघांचे निलंबन, एकाची सेवा समाप्त

https://ift.tt/IiFoEhL
लखनऊ : देशभरात गेल्या काही दिवसांपासून विजेचं संकट निर्माण झालं होतं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना काही दिवसांपूर्वी लाईट गेली होती. तर, मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचा देखील वीज पुरवठा खंडित झाला होता. उत्तर प्रदेशात देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण सुरु असताना वीज पुरवठा खंडित झाला. नेमक्या याच कारणामुळं ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चार पैकी तिघांवर निलंबनाची तर एका जणाची सेवा समाप्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अचानक वातावरणात बदल झाल्याने वीज वाहिन्या ट्रीप झाल्या होत्या. परिणामी लखनऊ मधील विधानसभा आणि इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाला. नेमक्या त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचं अभिभाषण सुरु होतं. राज्यपालांचं अभिषाण सुरु असताना वीज पुरवठा खंडीत झाल्यानं चार जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी एकाची सेवा समाप्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आज वातावरण बदलाचा फटका राज्यपालांच्या अभिभाषणाला बसला. यामुळे एका अधिकाऱ्याला सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये संजय पासवान, पुष्पेश गिरी यांचं निलंबन करण्यात आलं तर दीपक शर्मा यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्टिनपूरवा वीज उपकेंद्रात वाहिनी ट्रीप झाल्यानं कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. लाईन ट्रिप झाल्यानं विधानसभेच्या परिसरातील वीज पुरवठा बंद झाला होता. आज वातावरणातील बदल नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळाला. वादळ वाऱ्यासह पाऊस आल्यानं अनेकांची धावपळ उडाली. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एका झाडाची फांदी रस्त्यावर तुटून पडली होती. दरम्यान, आज उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशन सुरु झाल्यानंतर समाजवादी पक्षाकडून विधानसभेत आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. दुसरीकडे सपाचे आमदार आझम खान यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी आज आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी विधानसभेत गोंधळाचं वातावरण होतं.