माझी बदनामी करा, पण माझं कुटुंब आणि मातोश्री या मंदिराला काळिमा फासू नका : उद्धव ठाकरे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 25, 2022

माझी बदनामी करा, पण माझं कुटुंब आणि मातोश्री या मंदिराला काळिमा फासू नका : उद्धव ठाकरे

https://ift.tt/dHup1m7
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी विविध विषयांवर नगरसेवकांशी संवाद साधला. आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत, त्यांनीच हे करायला सांगितलंय, असं सांगून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. एकदा म्हणायचं राष्ट्रवादीवाले निधी देत नाहीत, मुख्यमंत्री भेटत नाहीत, काँग्रेस मदत करत नाही. एकनाथजींना बोलावलं, ते म्हणाले राष्ट्रवादीवाले त्रास देतात आमदारांचा दबाव आहे, भाजपसोबत गेलं पाहिजे. मी त्यांना विश्वासघातकी भाजपसोबत जायचं असेल, तर भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव आला पाहिजे, तो शिवसैनिकांना मान्य झाला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपसोबत गेले तर स्वच्छ, आपल्यात राहिलं तर आत टाकणार ही कसली मैत्री आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. माझी बदनामी करा, पण माझं कुटुंब आणि मातोश्री हे मंदिर आहे, त्याला काळिमा फासू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे म्हणाले. मातोश्री हे तुमचं श्रद्धास्थान मानता, त्याबद्दल बोललं जात असताना रक्त उसळत नाही. पण, आता सगळे तिकडे गेले तरी मी येणार नाहीस हे सांगितलं होतं. शिवसेना हेच माझं कुटुंब आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमदार माझ्याकडे आणा, असं सांगितलं होतं. ते बोलले असते तर इथे मार्ग निघाला असता, तसं न करता सुरत आणि गुवाहाटीला का गेलात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. इतके वर्ष एकनिष्ठ होतात, तर हक्काने का नाही सांगितलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जर मी पक्ष चालवायला नालायक वाटत असेन, तर शिवसेनाप्रमुखांचं आवाहन बाजूला ठेवा, बाळासाहेबांनी मी पुत्र असतो, तरी मला माफ केलं नसतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुम्हाला वाटत असेन, तर मी शिवसेना प्रमुख म्हणून राजीनामा देईन.शिवसेना ही खासगी मालमत्ता नाही, एक विचार आहे. शिवसेना हे कुटुंब आहे, शिवसेना हा विचार आहे. भाजप शिवसेनेला संपवायला निघाला आहे. भाजपला हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको आहे. भाजपसोबत ज्यावेळी कोण युती करत नव्हतं आम्ही त्यांच्या सोबत युती केली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा मोह मला आताही नाही. हिंदू मतामध्ये फूट नको, म्हणून युती केली, त्याची फळं आपण चाखतोय. त्यांनी आज गट स्थापन केला, आणि उद्या फुटला, तर बाकीचे डिसकॉलिफाय होईल. त्यामुळे याचा फायदा भाजप घेतंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. एकीकडे शिवसेना खतम, दुसरीकडे भाजप वाढवायची हा त्यांचा डाव कळलाय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.