गुजरात दंगल प्रकरण, तिस्टा सेटलवाड यांना अटक, गुजरात एटीएसची कारवाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 26, 2022

गुजरात दंगल प्रकरण, तिस्टा सेटलवाड यांना अटक, गुजरात एटीएसची कारवाई

https://ift.tt/GOksEpK
मुंबई : गुजरात दंगली प्रकरणी तिस्टा सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं अटक केली आहे. तिस्टा सेटलवाड यांच्या विरोधात अहमदाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत तक्रार दाखल आहे. गुजरात एटीएसची दोन पथके मुंबईत दाखल झाली. मुंबईत सांताक्रुझ येथील निवासस्थानातून तिस्टा सेटलवाड यांना प्रथम ताब्यात घेण्यात आलं. मुंबई पोलिसांकडील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिस्टा सेटलवाड यांना अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं २००२ मधील गुजरात दंगली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि इतर लोकांना एसआयटीनं दिलेल्या क्लीन चिट संदर्भातील याचिका शुक्रवारी फेटाळली. तिस्टा सेटलवाड यांच्या एनजीओनं जकिया जाफरी यांना कायदेशीर लढाईदरम्यान समर्थन दिलं होतं. जकिया जाफरी यांचे पती अहसान जाफरी यांचा गुजरात दंगलीमध्ये मृत्यू झाला होता. गुजरातच्या अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखा राज्याचे माजी डीजीपी आर.बी. श्रीकुमार यांना फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याशिवाय गुजरातचे माजी डीआयजी संजीव भट्ट सध्या तुरुंगात आहेत. सध्या ते पालनपूर तुरुंगात आहेत, ट्रान्सफर वॉरंट जारी करुन त्यांना ताब्यात घेण्यात येईल. गुजरात एटीएसच्या दोन टिम शनिवारी तिस्टा सेटलावड यांच्या घरी दाखल होत अटक केली. तिस्टा सेटलवाड यांच्या एनजीओच्या भूमिकेची चौकशी व्हावी, असं मत सुप्रीम कोर्टानं मांडली होतं. गुजरात एटीएसच्या एका सूत्रानं अहमदाबादच्या क्राइम ब्रांचकडे असलेल्या एफआयआरच्या आधारे अटक करण्यात सेटलवाड यांना अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.बी. बराड यांनी तीन आरोपींवर फसवणूक, खोट्या कागदपत्रांचा चुकीचा वापर, खोटे पुरावे सादर करणे यासंबंधात तक्रार दाखल केली होती. संजीव भट यांच्यावर नानावटी आयोगापुढं सादर कलेले पुरावे खोटे आणि चुकीचे असल्याचा ठपका आहे. या पुराव्यांच्या आधारे संजीव भट अनेकांना गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवू पाहात होते, असा आरोप आहे. गुजरातचे माजी डीजीपी आर.बी. श्रीकुमार यांच्यावर जाकिया जाफरी यांच्या तक्रारीत जे आरोप करण्यात आले ते नानावटी आयोगापुढं दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून घेण्यात आले होते, असा आरोप आहे. डीजीपी श्रीकुमार यांनी तिसऱ्या प्रतिज्ञापत्रापासून तत्कालीन राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली होती. श्रीकुमार यांनी खोटी कागदपत्र तयार केली होती, कार्यालयातील शिक्क्यांचा वापर करण्यात आला.