
मुंबई: आम्हाला यांचे आश्चर्य वाटते. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री, दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता, मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?, असा सवाल शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यात गुरुवारी भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याची सूत्रे (Eknath Shinde) यांच्या हातात देऊ केली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. ( slams and ) या पार्श्वभूमीवर 'सामना'तील अग्रलेखातून भाजपवर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे. कौरवांनी द्रौपदीस भरसभेत उभे करून बेइज्जत केले व धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसेच काहीसे महाराष्ट्रात घडले, पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रूचे, प्रतिष्ठेचे रक्षण केले. अब्रू लुटणारयांवर सुदर्शन चक्र चालवील नक्कीच! जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व महाराष्ट्राची, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावण्यात आला आहे. जगभरात लोकशाहाचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे. व विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार?, असा सवाल भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला विचारण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केले, पण पक्ष बदलण्याची व फुटीरतेला उत्तेजन देण्याची प्रक्रिया राजभवनात चालणार आहे का? महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करणाऱयांना घटनेचे रखवालदार राजभवनावरून ताकद कशी देऊ शकतात? लोकनियुक्त विधानसभेचे हक्क आमची न्यायालये व राज्यपाल कसे काय उद्ध्वस्त करू शकतात? या प्रश्नांची उत्तरे इतकी धूसर कधीच झाली नव्हती. पण आता उत्तरे कोणालाच नकोत. सत्ता हेच सगळ्या प्रश्नांचे उत्तर बनले आहे. महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणारयांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वत:वर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर, म्हणजे शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता, अशी खरमरीत टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.