राऊतांच्या अटकेनंतर सुनील राऊत आक्रमक; अटकेनंतर ईडीवर केला गंभीर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 1, 2022

राऊतांच्या अटकेनंतर सुनील राऊत आक्रमक; अटकेनंतर ईडीवर केला गंभीर आरोप

https://ift.tt/vjTgQy7
मुंबई: शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दीर्घ चौकशीनंतर अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ED)) मध्यरात्रीनंतर अटक केली. या अटकेनंतर खासदार राऊत यांचे भाऊ (Sunil Raut) यांनी अटकेबाबत ईडीवर गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. संजय राऊत आणि शिवसेनेचा आवाज दाबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून राऊत यांच्या विरोधात ईडीने खोटे पुरावे दाखवून ही अटक केली आहे, असा आरोप सुनील राऊत यांनी अटकेनंतर केला आहे. शेवटी सत्याचाच विजय होणार असून आम्ही लढतच राहू, असेही सुनील राऊत यांनी म्हटले आहे. ( has made a serious allegation that Sanjay Raut was arrested by ED on the basis of false evidence) खासदार संजय राऊत हे भारतीय जनता पक्षासोबत लढत आहेत. शिवसेना भाजपविरोधात लढत आहेत. संजय राऊत आणि शिवसेनेचा हा आवाज दाबण्यासाठीच ही कारवाई करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. जी कागदपत्रे राऊत यांनी आयकर विभागाकडे सादर केलेली आहेत, जी कागदपत्रे राज्यसभेत शपथपत्रासह सादर केली, तीच कागदपत्रे ईडीकडे आहेत. वेगळे असे कोणतेही पुरावे ईडीकडे नाहीत. मात्र, ईडीने करण्यात यावी यासाठी खोटे पुरावे दाखवले आहेत, असे सुनील राऊत म्हणाले. प्रत्येक शिवसैनिकातून संजय राऊत पैदा होईल- सुनील राऊत राऊत यांच्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना घेरले. त्यावेळी राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, खासदार संजय राऊत यांना अटक झाली असली तरी संजय राऊत जराही डगमगणार नाहीत. ते लढत राहणार. काहीही झाले तरी राऊत लढतच राहतील. काहीही झाले तरी संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडणार नाहीत. आम्ही न्यायालयीन लढाई लढू. ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. आता पाहा, प्रत्येक शिवसैनिकात संजय राऊत निर्माण होतील. छत्रपती शिवाजी महाराजही एकटेच लढले. त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे संजय राऊत देखील लढतील. महाभारत आपल्याला माहीत आहे. महाभारतात शेवटी सत्याचाच विजय झाले आहे. शेवटी सत्याचाच विजय होईल, आम्ही न्यायालयीन लढाई लढत राहू, असेही ते म्हणाले.