दहिसर ते भाईंदर १० मिनिटांत पोहोचणार; ४५ मिनिटांच्या कोंडीवर मुंबई महापालिकेने काढला उपाय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 17, 2022

demo-image

दहिसर ते भाईंदर १० मिनिटांत पोहोचणार; ४५ मिनिटांच्या कोंडीवर मुंबई महापालिकेने काढला उपाय

https://ift.tt/48m0blE
photo-93605111
४५ मिनिटांच्या कोंडीवर लिंक रोडचा उपाय म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईः मुंबईचे प्रवेशद्वार असलेले दहिसर हे उपनगर वाहतूककोंडीत कायम अडकलेले असते. रोज हजारो वाहनचालकांना त्याचा फटका बसत आहे. मुंबई महापालिकेने त्यावर उपाय म्हणून काही पर्याय योजले असून त्यात दहिसर ते भाईंदरपर्यंत लिंक रोडचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईतून भाईंदर, वसई, विरार, पालघरसह गुजरातपर्यंत जाताना वाहनचालकांना वाहतूककोंडीस सामोरे जावे लागणार नाही. दहिसर चेकनाक्यावरून मुंबईत येताना वा ठाणे, विरार वा गुजरातच्या दिशेने जाताना प्रवास करणे जिकिरीचे ठरले आहे. त्यावर दहिसर ते भाईंदरपर्यंतच्या नवीन सहा किमी मार्गावरील बहुतांश भाग हा उड्डाणपुलाच्या पद्धतीने बांधला जाणार आहे. सध्या दहिसर ते भाईंदरपर्यंतच्या प्रवासास वाहनचालकांना किमान ४५ मिनिटे लागतात. आता मात्र हे अंतर फक्त दहा मिनिटात गाठता येईल. दहिसर ते मीरा रोड, भाईंदरपर्यंत जाण्यासाठी दहिसर पश्चिमेतील खाडी भागातून हा मार्ग जात भाईंदर पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडे उड्डाणपुलाच्या साहाय्याने जोडला जाईल. त्यासाठी पालिकेस मिठागर क्षेत्रातील जागा अधिग्रहण करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे ४०० कोटी रु. खर्च येणार आहे. त्यानंतर, १२० फूट लांबीचा रास्ता तयार केला जाणार आहे. पालिकेच्या रस्ते विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या नवीन रस्त्याने दहिसर ते भाईंदरमधील अंतर कमी होईल, असा दावा पालिकेने केला आहे. सध्या रस्ते मार्गाचा विचार केल्यास दहिसर चेक नका, काशीमीरा, सिल्वर पार्क, कनाकिया, गोल्डन नेस्ट सर्कल अशा काही भागात मोठ्या स्वरूपात वाहतूककोंडी निर्माण होते. साधारण, २०१६मध्ये रस्त्यासाठी प्रस्तावित लिंक रोडची संकल्पना पुढे आली होती. प्रत्यक्षात त्यास गतवर्षी अधिक वेग आला. पालिकेने या प्रकल्पाची सुरुवात जुलै २०२२पासून सुरू करण्याचे ठरले होते. त्यातील निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असून २०२६पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. १८०० कोटी रुपये खर्च हा नवीन मार्ग सुमारे सहा किमी अंतराचा उड्डाणपूल उन्नत मार्ग स्वरूपात आहे पालिकेच्या योजनेनुसार या नवीन मार्गासाठी सुमारे १,८०० कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी नुकतीच निविदा काढण्यात आली आहे.

Pages