नवी मुंबईतील गावात सुरू होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच समोर आले मोठे षडयंत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 12, 2022

नवी मुंबईतील गावात सुरू होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच समोर आले मोठे षडयंत्र

https://ift.tt/VbgEUor
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः नोकरीचे, लग्नाचे आमिष दाखवून राज्यातील; तसेच परराज्यांतील तरुणींना मुंबईत आणून डांबून ठेवले जाते. त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांना देहव्यापाराच्या दलदलीत ढकलले जाते. अशा अनेक कहाण्या चित्रपटात पाहायला मिळतात. प्रत्यक्षातही असे घडत असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नवी मुंबईतील एका गावात टाकलेल्या छाप्यावरून उघड झाले आहे. या पथकाने देहव्यापार चालवणाऱ्या दलालांच्या मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने घरकामाचे प्रलोभन दाखवून आणलेल्या १७ तरुणींना एका ठिकाणी कोंडून ठेवले होते. मुंबई पोलिसांनी या तरुणींची कोंडवाड्यातून सुटका केली. नवी मुंबईतील जुईनगरच्या शिरोना गावात काही दलाल परराज्यातून महिलांना वेगवेगळी आमिषे दाखवून आणतात आणि एका ठिकाणी कोंडून ठेवतात. या महिलांसाठी परतीचे मार्ग बंद करून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतला जातो, अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. या दलालांच्या तावडीतून पळालेल्या एका महिलेनेच ही माहिती दिली. गुन्हे शाखा आणि समाजसेवा शाखेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वेगवेगळी चार पथके तयार करण्यात आली. शिरोना गावात मोठ्या संख्येने महिलांना डांबून ठेवले असल्याचे त्या महिलेने सांगितल्याने पोलिसांच्या चारही पथकांनी एकाच वेळी या गावामध्ये छापा टाकला. तेव्हा एके ठिकाणी १७ तरुणींना कोंडून ठेवल्याचे आढळले. त्यांना देहव्यापार करण्यास भाग पाडणाऱ्या नऊ दलालांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांना सुटका केलेल्या तरुणी आणि अटकेत असलेल्या दलालांकडे चौकशी केली असता राजू आणि साहिल हे दोघे या टोळीचे प्रमुख असल्याचे समजले. पोलिस या दोघांचाही शोध घेत आहेत. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे, तर सुटका करण्यात आलेल्या तरुणींना महिला बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे प्रकरण फार गंभीर असल्याने त्याचा तपास अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलिस निरीक्षक अनिता कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील सर्वाधिक तरुणी देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून या तरुणींना आणण्यात आले असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हॉटेलमध्ये नेऊन त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात होता. यातील बहुतांश तरुणी पश्चिम बंगालमधील आहेत. नवी मुंबईपासून देशभरात दलालांची मोठी साखळी सक्रिय असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.