कोकणातील रिफायनरी गुजरातमध्ये न्या; रिफायनरी विरोधकांनी केलं अवाहन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 15, 2022

demo-image

कोकणातील रिफायनरी गुजरातमध्ये न्या; रिफायनरी विरोधकांनी केलं अवाहन

https://ift.tt/LzXo6Js
photo-94210702
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः गुजरातमध्ये गेल्यानंतर या घटनेचे समाजाच्या विविध थरांमध्ये पडसाद उमटत आहेत. कोकणामध्ये अशा प्रदूषणकारी नसलेल्या प्रकल्पांसाठी कोकणामध्ये जागा नक्कीच उपलब्ध करून दिली जाईल. असे प्रकल्प कोकणामध्ये आणून कोकणातील रिफायनरी गुजरातमध्ये न्यावी, असे आवाहन बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी केले आहे. कोकणामध्ये निसर्गाची नासधूस करून असे प्रकल्प राबवण्यापेक्षा कच्छच्या रणासारख्या हजारो एकर परिसरात जिथे शेती होऊ शकत नाही तिथे असे प्रकल्प उभारले का जात नाहीत, असा प्रश्न कोकण रिफायनरीविरोधी संघटनेचे सचिव नितीन जठार यांनी उपस्थित केला. कोकणामधील निसर्ग जपून जे उद्योग येणार असतील त्याला कोकणवासीयांचा विरोध नसून त्यासाठी जमिनी देण्यासाठी आवाहन केले जाईल, असेही ते म्हणाले. कोकणवासी हे देशाच्या विकासाच्या विरोधात नसून शेती, जमीन यांचे नुकसान होऊ नये एवढीच आमची मागणी आहे. कोकणामधील आंबा, काजू याचा वापर होणारी कृषी आधारित एमआयडीसी या भागामध्ये तयार होऊ शकते. तसेच फॅब्रिकेशन प्लाण्ट, पूर्वी सुचवल्याप्रमाणे रेल्वे कारखाना हेही शक्य आहे. पर्यटनाच्या दृष्टीने वाव आहे. मात्र याचा विचार न करता रसायनाधारित उद्योग आणले जाऊ नयेत, असे ते म्हणाले. कोकणामध्ये तळेगाव, जुन्नरसारखे प्रकल्प, लहान एमआयडीसी, आयटी उद्योग, शैक्षणिक उद्योग, अन्नधान्याशी संबंधित उद्योग आणले तर स्थानिक नागरिक पुढाकार घेऊन जमिनी देतील असेही त्यांनी सांगितले.

Pages