रत्नागिरी : राज्यात सत्ताबदलाच्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु आहे. () यांच्याबरोबर असलेले खासदार () सध्या कोणता झेंडा घेऊ हाती, या विचारात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण चार दिवसांपूर्वी कीर्तिकरांनी शिंदे गटातील नेते () यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. कदमांनीही कीर्तिकरांनी निर्णय घेतल्यास स्वागतच असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले गजानन कीर्तिकर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. अगदी दसरा मेळाव्यातही थेट माध्यमांसमोर कीर्तीकरांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. गजानन किर्तीकर मागील काही दिवसांपासून द्विधा मनस्थितीत असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानात आणि शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, ती चूक पुन्हा नको, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर कीर्तिकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतल्याने हा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. हेही वाचा : या भेटीवर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. “चार दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकर माझ्याकडे आले होते. मराठी माणसाला नोकरी देण्यासाठी गजानन कीर्तिकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची साथ सोडत, भाजपाबरोबर युती करावी. बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधातील भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडावी, असं त्यांचं म्हणणं आहे. गजानन किर्तीकर शिंदे गटात आले, तर त्यांचं स्वागत आहे,” असंही रामदास कदम यांनी म्हटलं. कोण आहेत गजानन कीर्तिकर? गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. १९९० ते २००९ या काळात चार वेळा आमदार राहिले आहे कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा अंदाजे १,८३,००० मतांच्या फरकाने पराभव केला. ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. हेही वाचा :