'मी तुमची मुलगी आहे हे विसरून जा...' म्हणत श्रद्धाने सोडलं होतं घर, दुर्दैवाने शब्द ठरले खरे! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 15, 2022

'मी तुमची मुलगी आहे हे विसरून जा...' म्हणत श्रद्धाने सोडलं होतं घर, दुर्दैवाने शब्द ठरले खरे!

https://ift.tt/rlL9aAw
मुंबई/ दिल्लीः राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा देशाला हादरवणारी घटना घडली आहे. वसईतील तरुणीची दिल्लीत निर्घुण हत्या करण्यात आली आहे. आफताब अमीन पूनावाला (२८) या नराधमाने त्याच्यासोबत ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२९) हिची १८ मे रोजी गळा दाबून हत्या केली. वसईला राहणारे श्रद्धाचे वडील तिचा शोध घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले, तेव्हा या गुन्ह्याची उकल झाली आहे. दरम्यान, कुटुंबीयांसोबत भांडून श्रद्धा आफताबसोहत लिव्ह-इनमध्ये राहण्यास गेली होती. घरच्यांशी भांडून आपलं प्रेम टिकवायला निघालेल्या श्रद्धाचा दुर्देवी अंत झाली आहे. () विकास वालकर हे श्रद्धाचे वडिल आहे. ते वसई येथे राहतात. श्रद्धासोबत काहीतरी बरे-वाइट झाल्याच्या भीतीने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पण अखेर त्यांची शंका खरी ठरली. विकास वालकर यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, श्रद्धा मालाडमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिथे तिची अफताबसोबत ओळख झाली. त्यानंतर ८-९ महिन्यांनंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं आम्हाला कळलं. २०१९मध्ये श्रद्धाने तिच्या आईला मला अफताबसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचंय असं सांगितलं. पण आम्ही श्रद्धाच्या त्या निर्णयाला नकार दिला, असं विकास वालकर यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. श्रद्धाच्या निर्णयाला नकार दिल्यानंतर तिने घरच्यांसोबत वाद घातला. मी वयाची २५ वर्ष पूर्ण केली असून मला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं म्हणत घराच्या बाहेर पडली. जाता जाता तिने तुम्हाला कोणी मुलगी होती हे विसरून जा, असं म्हणत तिने घर कायमच सोडलं, अशी खंत तिच्या वडिलांनी बोलून दाखवली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिचे आणि तिच्या वडिलांमध्ये मतभेद होते. कॉलेजमध्येही तिने तिच्या शिक्षकांना व मित्र-मैत्रिणींना तिला वडिल नसल्याचं सांगितलं होतं. तसंच, आई आणि लहान भावासाठी मी एकटीच कमावती असल्याचं म्हटलं होतं. वाचाः श्रद्धाने घर सोडल्यानंतर तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी फारशा संबंध ठेवला नव्हता. काही दिवसांनी श्रद्धाने कुटुंबीयांसोबत संपर्क साधला तेव्हा तिने अफताब तिला मारहाण करत असल्याचं म्हटलं होतं. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला परत येण्याचा सल्ला दिला होता. वडिलांचं ऐकून ती घरी परतली होती. मात्र, अफताबने माफी मागितल्यानंतर ती पुन्हा त्यांच्यासोबत राहायला लागली. १४ सप्टेंबर रोजी श्रद्धाच्या भावाला तिच्या मित्र-मैत्रिणींचा फोन आला की, गेल्या दोन महिन्यांपासून तिचा फोन बंद येतोय. जुलै आणि ऑगस्ट दोन महिने झाले श्रद्धाचा फोन बंद येतोय हे कळल्यावर तिच्या वडिलांनी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार केली. मुंबई पोलिसांनी तपास केल्यानंतर श्रद्धाच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन दिल्ली आढळले. तसेच ‘कॉल रेकॉर्ड डिटेल’वरून श्रद्धाचा मोबाइल मे महिन्यापासून बंद असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या वडिलांनी मुंबई पोलिसांसह दिल्ली गाठली. ते तिच्या घरी गेले असता, घराला कुलूप होते. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि ८ नोव्हेंबरला श्रद्धाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाचाः श्रद्धाने लग्न करण्यासाठी आफताबच्या मागे तगादा लावला. परंतु त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद होत असे. १८ मे रोजी दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आफताबने तिची हत्या केली, अशी माहिती दक्षिण जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त-१ अंकित चौहान यांनी दिली.