गुड न्यूज! मुंबईतील पार्किंगची कटकट मिटणार; वांद्रे, वरळी, फोर्टला होणार भूमिगत पार्किंग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 8, 2023

गुड न्यूज! मुंबईतील पार्किंगची कटकट मिटणार; वांद्रे, वरळी, फोर्टला होणार भूमिगत पार्किंग

https://ift.tt/0awSEJI
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत रस्ते कमी आणि गाड्या अधिक अशी स्थिती आहे. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळेत सर्वत्र वाहतूककोंडी असते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने वाहनतळांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचा एक भाग म्हणून वांद्रे, वरळी आणि फोर्ट परिसरात भूमिगत इलेक्ट्रिकल वाहनतळ उभारली जाणार आहेत. शटल आणि रोबो अशी ही पार्किंग व्यवस्था असून त्यात शेकडो गाड्या उभ्या करण्याचे प्रस्तावित आहे.मुंबईत अंदाजे ३० ते ३५ लाख वाहने आहेत. त्या तुलनेत शहरात वाहनतळांची संख्या अपुरी आहे. पालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या वाहनतळांत सुमारे ४० ते ४५ हजार वाहने पार्क होतात. परिणामी, मुंबईतील कोणत्याही भागात वाहतूककोंडी असते. त्याचा फटका वाहनचालकांना बसत असून कोट्यवधी रुपयांचे इंधन, मानवी तास व पैशांची नासाडी होत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेने वाहनतळांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.टर्न की/ ईपीसी तत्त्वावर वांद्रे पश्चिम परिसरातील पटवर्धन पार्क उद्यान, बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तर बाजूकडे बहुमजली इलेक्ट्रिकल कार पार्किंग (शटल आणि रोबो पार्किंग) नियोजन, आरेखन, बांधकामासाठी ई-निविदा निमंत्रण मागवण्यात आले आहेत. या वाहनतळाची देखभाल आणि सर्व्हिसिंग, तसेच मनुष्यबळ २० वर्षांसाठी कंत्राटदाराला पुरवावे लागणार आहे. वाहनतळ उभारणीनंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रचालन, देखभाल आणि साफसफाई ठेवणे बंधनकारक आहे. कुलाबा ए विभागात फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) येथील अप्सरा पेन शॉपसमोरील वाहतूक बेटात तसेच वरळी जी दक्षिण प्रभागामधील डॉ. ई. मोझेस रोड येथील महापालिका इंजिनीअरिंग हब इमारतीला लागून असलेल्या प्लॉटवर भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहे. या वाहनतळाची देखभाल आणि सर्व्हिसिंग तसेच मनुष्यबळ २० वर्षांसाठी कंत्राटदाराला पुरवावे लागणार आहे. वाहनतळ उभारणीनंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रचालन, देखभाल आणि साफसफाई ठेवणे बंधनकारक आहे. हुतात्म्यांच्या वारसांना पार्किंग कंत्राटकुलाबा ए विभागात मुंबई समाचार मार्ग, फोर्ट येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना, तसेच वारसांच्या संस्थेला पे अँड पार्कचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पार्किंग व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी निविदा मागवल्या आहेत. या वाहनतळातून पालिकेला एक कोटी २४ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.