वितभर पोटासाठी गमावला जीव! समृद्धी महामार्गावर चहा विकायला गेला, मागून आला भरधाव टँकर आणि... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 3, 2023

वितभर पोटासाठी गमावला जीव! समृद्धी महामार्गावर चहा विकायला गेला, मागून आला भरधाव टँकर आणि...

https://ift.tt/IcV6pAT
वाशिम : वाहतुकीसाठी खुला झाल्यापासूननच वेग वेगळ्या कारणाने मोठे अपघात होत आहेत. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असाच एक मोठा अपघात आज सकाळी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इंटरचेंजच्या जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने यात एकजण जागीच गतप्राण झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार मृत्युमुखी पडलेले माधव बालाजी वानखेडे (वय ४५ वर्ष रा. ईरळा ता. मालेगाव जि.वाशिम) हे इंटरचेंज जवळ चहा विकत होते. तिथे चहा पिण्यासाठी टँकरचालक थांबला होता. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली व हा अपघात घडला, ज्यात चहा विक्रीसाठी उभे असलेले वानखेडे यांचा मृत्यू झाला, टँकर पलटी झाल्याने व कंटेनरचा समोरील भाग पूर्णपने चुरा झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर सध्या खानपाणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने चालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच लांब पल्ल्याचा प्रवास करणारे चालक थकवा घालविण्यासाठी चहाचा सहारा घेत असतात. हीच बाब हेरून अनेकजण थर्मासमध्ये चहा भरून या महामार्गावर विकतात. मात्र हेच आता अपघाताचे कारण ठरत आहे. या आधीही एका फळ विक्रेत्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. ज्याठिकाणी आजचा अपघात झाला तिथून टोल नाका व इंटरचेंज जवळच आहे. इथे समृद्धी महामार्गावरील कर्मचारी नेहमी असतात मात्र चहा विक्रीची ही बाब त्यांच्या निदर्शनास कशी आली नाही हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून अधिकृत माहिती नाहीसमृद्धी महामार्गावर अनेक मोठे अपघात होत असताना या अपघातांची अधिकृत माहिती महामार्ग प्राधिकरणाकडून माध्यमांना दिली जात नाही. बहुतेक वेळा झालेल्या अपघाताची माहिती लपवण्याचाच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा हेतू असल्याचे दिसून येत आहे.