गजरतमधय बपरजय वधवसक हणयच धकमनसनवर परणम हणर क? आयएमडन कल सपषट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 14, 2023

गजरतमधय बपरजय वधवसक हणयच धकमनसनवर परणम हणर क? आयएमडन कल सपषट

https://ift.tt/7SsOReY
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : बिपर्जय वादळामध्ये मोठे नुकसान करण्याची क्षमता असून, गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्याला याचा फटका बसू शकतो. वादळामुळे विध्वंस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला. अतिविध्वंसाची बिपर्जयची क्षमता कमी झाली असली तरी तीव्रता कायम आहे. आत्तापर्यंत सुमारे २१ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.‘गंभीर स्वरूपातील बिपर्जय चक्रीवादळ १५ जनूला संध्याकाळी गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या काळामध्ये ताशी १२५ ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किनाऱ्यातील परिसराचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ‘गुजरातच्या कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर जिल्ह्यात १३ ते १५ जून या कालावधीमध्ये जोरदार पावसाचीही शक्यता आहे. सखल, किनारपट्टी भागांना पुराचा धोका आहे,’ असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. राजकोट, मोरबी, जनुगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये ताशी १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांमुळे घरे, रस्ते, वीजवाहिन्या, दूरसंचार यंत्रणा, पिकांचे नुकसान होण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. ‘सहा मीटर उंचीच्या भरतीच्या लाटांमुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनाऱ्यावरील सखल भाग जलमय होण्याची शक्यता आहे. आम्ही या भागातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची शिफारस केली असून त्यानुसार पावले उचलली जात आहेत,’ असे मोहपात्रा म्हणाले.

२१ हजार नागरिक सुरक्षितस्थळी

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये सज्जता ठेवण्यात आली असून, किनारी जिल्ह्यांतील २१ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके आणि राज्याची आपत्ती निवारण पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. जाखाऊ बंदराजवळ वादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेत हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. तसेच एरवी प्रचंड वर्दळीचे आणि उलाढालीचे असलेले हे बंदर व्यवहारांविना शांत आहे. येथील मच्छिमारी बोटीही नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागही सज्ज

वादळामुळे कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सज्जता करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री अनसुख मांडविया यांनी दिली. बंदरावर काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तेथून हलवण्यात आले आहे. मांडविया स्वत: भूजमध्ये दाखल झाले असून, आणखी चार केंद्रीय मंत्रीही गुजरातमध्ये आपत्ती निवारणाचे नियोजन करण्यासाठी दाखल होत आहेत.

मान्सूनवर परिणाम नाही

बिपर्जय वादळाचा मान्सूनच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा नसल्याने देशातील पावसाच्या मार्गक्रमणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी स्पष्ट केले. ‘वादळामुळे दक्षिण भारतात मान्सूनची आगेकूच वेगात सुरू झाली आहे. मात्र आता दोन्ही मार्ग वेगळे असल्याने मान्सूनच्या क्षमतेवर त्याचा प्रदीर्घ परिणाम होणार नाही’, असेही विभागाने म्हटले आहे.