
नाशिक/ नागपूर : यांनी केलेल्या आरोपावर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी प्रकाश सोळंकेंचा संदर्भ देत जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होते, मी बीड जिल्ह्यातून वरिष्ठ आहे. मला मंत्री करा ही त्यांची अपेक्षा होती. माझ्या सोबत त्यांची चर्चा सुरू होती, तेव्हा अजितदादा आले, मला न विचारता त्यांनी कार्याध्यक्ष बनविण्याचे आश्वासन दिले,माझा त्यात काही रोल नव्हता, असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर पक्षाने कधी मला अध्यक्ष पद सोडा,त्यांना अध्यक्ष करायचे आहे असे सांगितले नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होते. त्यांच्यावरील जो अन्याय झाला होता तो दूर करण्याची मोठी संधी अजितदादा यांना होती. त्यांनी नवं मंत्रिमंडळ करताना त्यांना संधी द्यायला हरकत नव्हती, असं जयंत पाटील म्हणाले. अजित पवार चुकीचा आरोप करत आहेत, मी मुद्दाम काही बोलत नाही. त्यांनी चुकीचे आरोप करू नये. जे पवार साहेबांनी प्रत्यक्ष केले ते सर्व जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कोणी कोणाशी काय चर्चा केली ते चार महिन्यांनी सांगत असतील त्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.पूर्वी पवार साहेबांशी काय चर्चा केली त्यांना दोघांना माहीती आहे, तो त्या दोघांचा प्रश्न आहे. आम्हला खाजगीमध्ये जी भूमिका सांगितली आहे त्या प्रमाण काम करत आहोत. अजित पवार गटाची त्यांची वेगळी चूल आहे, ते त्याचे उमेदवार ऊभे करणार त्यात तक्रार करण्याचे कारण नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. अजितदादा यांनी पवार साहेबांशी जी चर्चा झाली ती आम्हला वेळोवेळी सांगितले असते तर हे अंतर आम्ही पडू दिले नसते, असंही जयंत पाटील म्हणाले. कोणतीही बैठक झाली मला माहीत नाही,मी कोणत्याही व्यावसायिकच्या घरी बैठकीत उपस्थित नव्हतो. माझ्या घरी कुठलीच मिटींग झाली नाही, असंही ते म्हणाले.