-
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोन म्हटला की त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बॅक कव्हर आलेच. हल्ली विविध रंगाचे, डिझाईनचे बॅक कव्हर बाजारात उपलब्ध आहेत.
-
आपण अनेकदा दर दोन किंवा तीन महिन्यांनी स्मार्टफोनचे बॅक कव्हर बदलत असतो. पण तुम्हाला माहितीये का? हेच बॅक कव्हर तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरु शकतात. आपण आपल्या फोनच्या संरक्षणासाठी बॅक कव्हर लावतो, पण तीच आपल्यासाठी एक मोठी चूक ठरू शकते.
-
फोनला कव्हर लावण्याचे ज्याप्रकारे फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. फोनवर काम करताना किंवा चार्जिंग करताना तो गरम होतो. कव्हर लावल्यामुळे ही उष्णता बाहेर पडत नाही. यामुळे फोन जास्त गरम होतो. ज्यामुळे बॅटरीची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे फोन हळू हळू चालतो.
-
फोनला काही जाड किंवा धातूचे कव्हर लावल्याने नेटवर्क अँटेनामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सिग्नल कमकुवत होऊ शकतो. परिणामी, फोनवर बोलताना किंवा इंटरनेट वापरताना समस्या येऊ शकते.
-
अनेक कंपन्यांचे फोन खूप आकर्षक डिझाईन आणि रंगांमध्ये येतात. पण कव्हर लावल्यामुळे हे सुंदर डिझाइन लपून जाते.
-
फोनला कव्हर लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पडल्यास किंवा स्क्रॅच लागण्यापासून सुरक्षित राहतो. काही कव्हरमुळे फोनची पकड चांगली राहते, ज्यामुळे तो हातातून निसटण्याची शक्यता कमी होते.