
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात पाकिस्तानवर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह सुपर मधील स्थान निश्चित केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 128 धावांचं आव्हान भारताने 25 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 15.5 षटकात 131 धावा केल्या. भारताच्या या विजयात एकूण 6 जणांनी प्रमुख भूमिका बजावली. हे 6 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.