नसीरुद्दीन, शबानांचा पुनर्विचार याचिकेस विरोध - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 26, 2019

नसीरुद्दीन, शबानांचा पुनर्विचार याचिकेस विरोध

https://ift.tt/2QSMCQi
मुंबई: अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील सुमारे १०० मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याला विरोध दर्शवला आहे. हा वाद कायम राहिल्यास मुस्लीम समाजाचे नुकसान होऊ शकते असे या सर्वांना वाटते. पुनर्विचार याचिकेवा विरोध करण्याबाबतच्या निवेदनावर विद्वान, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलाकार, चित्रपट निर्माते आणि नाट्यकालावंतांच्या सह्या आहेत. या प्रस्तावित पुनर्विचार याचिकेमुळे केवळ मुस्लीम समाजाचे नुकसाच होईल, या मुळे या समाजाला कोणत्याही कोणताही फायदा होणार नाही असे या दिग्गजांना वाटते. हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने कायद्याच्या वर श्रद्धेला ठेवले ही गोष्ट भारतीय मुस्लीम समाज, घटनातज्ज्ञ आणि धर्मनिरपेक्ष संघटनांना पटलेली नाही, असेही या निवदेनात नमूद करण्यात आले आहे. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमींसह १०० दिग्गज या निवेदनावर सही करणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी , सामाजिक कार्यकर्ते आरिज मोहम्मद, वकील ए. जे. जावेद, लेखक आणि स्तंभलेखक कादर मुकादम, संगीतकार अफाक आझाद, पत्रकार आफताब खान, हॉटेल व्यावलायिक आणि कार्यकर्ते अफझल पटेल, चित्रपट लेखक अंजुम राजाबाली, उद्योजक आरिफ कपाडिया यांच्यासह इतर दिग्गज सहभागी आहेत. 'कटु अनुभवांवरून आपण काहीच शिकलो नाही का?' तीन दशकांपासून सुरू असलेल्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादादरम्यान आपल्याला काय मिळाले आणि आपण काय गमावले याचा विचार करावा असा आग्रह आम्ही भारतीय मुस्लीम समाजाला करत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे. एका बाजूला मुस्लीमांचा जीव आणि संपत्तीचा नाश करणे आणि दुसऱ्या बाजूला संघ परिवाराच्या राजकारणाला शक्ती देणे असा याचा अर्थ होत नाही का, असा प्रश्नही निवेदनात विचारण्यात आला आहे. जातीय दंग्यांमध्ये आपल्याला आलेल्या कटु अनुभवांद्वारे आपण काही शिकलेलो नाही काय. या सर्व प्रकरणात मुस्लीम समाजानेच किंमत चुकवलेली आहे, असे या निवदेनात म्हटले आहे. 'या वादापासून दूर राहा' या प्रकरणी मुस्लीमांनी पुढे पाऊल टाकावे असा सल्ला अनेकांनी दिला आहे. मात्र, मुस्लिमांनी या मंदिर-मशीद वादापासून दूर राहावे कारण यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला अंजेडा लपवण्यास मदत मिळेल, असे आवाहन या निवेदनाद्वारे मुस्लीम समाजाला करण्यात आले आहे. या वादामुळे मुस्लीम विरोधी प्रचार आणि इस्लामोफोबियाला चालना मिळेल, शिवाय यामुळे धार्मिक ध्रुवीकरणही होईल असे निवेदात म्हटले आहे.