देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो: अमृता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो: अमृता

https://ift.tt/2WV86NB
मुंबई: मुख्यमंत्री यांची पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पत्नी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय आणि भूमिकेमुळं त्यांचा अभिमान वाटतो, असं ट्विट त्यांनी केलं. याआधीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यांनी दोनशे टक्के योगदान देऊन काम केलं आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. विधानसभा निवडणूक निकाल लागून दोन आठवडे झाले तरी, सत्तास्थापनेचं नाट्य सुरू आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यावर फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय आणि भूमिकेबद्दल त्यांचा अभिमान वाटतो,' असं ट्विट त्यांनी केलं. याआधीही त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनशे टक्के देऊन काम केलं आहे, त्यांच्याएवढं काम ‘भूतो न भविष्यति...’ कोणीही करू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीला त्यांच्याइतका न्याय आणखी कोणी देऊ शकत नाही हे भाजपचे नेते आणि राज्यातील जनतेलाही ठाऊक आहे,' असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, निवडणूक निकालानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून सत्तानाट्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जाऊन फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे राजीनामा सुपुर्द केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होतं. कारण महायुतीला जनतेने मतदान केलं होतं. महायुती म्हणून आम्ही निवडून आलो होतो. असं असताना उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असं का म्हटले? हा आमच्यासमोर प्रश्न होता. त्यानंतर मी संवाद साधण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. पण त्यांनी माझेही फोन घेतले नाही. त्यांनीच चर्चा थांबवली. शिवसेनेनेच चर्चेची दारे बंद केली होती. आम्ही चर्चा थांबवली नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीय आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून कोणतंही वक्तव्य केलं गेलं नाही. कधीही करणार नाही, असं सांगतानाच गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने मात्र आमचे सर्वात मोठे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. त्यांनी मुखपत्रातूनही टीका केली आणि जाहीरपणेही टीका केली. केंद्रात मोदींसोबत राहायचं आणि इकडे टीका करायची हे योग्य नव्हतं. काँग्रेसनेही कधी त्यांच्यावर एवढ्या थराला जाऊन टीका केली नव्हती. विरोधकांनी जेवढे घातले नाही तेवढे घाव त्यांनी घातले. असं असतानाही आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. मोदींवर टीका करणार नसल्याचं शिवसेनेने आम्हाला सांगितलं होतं. व्यक्तीऐवजी धोरणांवर टीका करणार असल्याचं ते म्हणाले होते. पण तरीही त्यांची टीका सुरूच होती, असं सांगतानाच आम्हालाही उत्तरं देता येतात. पण आम्ही देणार नाही. आम्ही सभ्य आहोत. आमचा तो स्वभाव नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.