अयोध्या निकाल कोर्टाचा, सरकारचा नाही: राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

अयोध्या निकाल कोर्टाचा, सरकारचा नाही: राऊत

https://ift.tt/36PKJcA
मुंबई: अयोध्येत बाबरी मशीद पडली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतरत देशात हिंदुत्वाची लाट आली आणि त्याच लाटेवर आज अनेकजण उभे आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता लगावला. बाबरी मशीद पडली तेव्हा काही लोक पळून गेले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हेच पुढे आले होते. हे लक्षात घेता अयोध्येत भविष्यात मंदिर उभारणीत शिवसेनेचे मोठे योगदान आहे असे संजय राऊत म्हणाले. अयोध्या प्रकरणावरील हा ऐतिहासिक निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही असेही राऊत म्हणाले. राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर दररोज पत्रकार परिषदांचा धडाका लावणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आजही पत्रकार परिषद घेतली. मात्र, राऊत यांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ही सत्तेबाबतची नव्हती, तर ती होती रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाबाबतच्या खटल्याच्या निकालाबाबत. मात्र, दररोज भारतीय जनता पक्षावर टीकेचे बाण चालवणाऱ्या राऊत यांनी अयोध्या खटल्याच्या निकालाच्या मुद्द्यावरूनही भारतीय जनता पक्ष आणि केद्र सरकारलाच आपल्या टीकेचे लक्ष्य केले. या वेळी बोलताना त्यांनी राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्याचे श्रेय भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकारने घेऊ नये,असे अप्रत्यक्षपणे सांगितले. मात्र, राम मंदिर उभारणी झालीच तर त्यांचे श्रेय शिवसेना या पक्षाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आज लागणारा निकाल हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याचे राऊत पुढे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारने अध्यादेश काढून राम मंदिर बांधण्याचं काम सुरू करावं अशी मागणी केली होती. त्यानंतर, सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वीकारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होत आणि तेच आम्ही करतोय, असेही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्वोच्च असून, तो मानला पाहिजे अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे १९९१-९२ सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असेही राऊत म्हणाले.