लतादीदी आयसीयूत; तब्येत अजूनही नाजूक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 13, 2019

लतादीदी आयसीयूत; तब्येत अजूनही नाजूक

https://ift.tt/2NIeDIn
मुंबई: मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार घेणाऱ्या स्वरसम्राज्ञी यांची तब्येत अजूनही नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने लतादीदींना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लतादीदींच्या तब्येतीबाबतचे वृत्त कळताच त्यांच्या जगभरातील चाहत्यांमध्ये चितेचे वातावरण परसले आहे. जवळजवळ तीन पिढ्या लतादीदींचे गाणे ऐकत वाढल्या आहेत. सध्या गात नसल्या तरी देखील ट्विटरद्वारे त्या आपल्या चाहत्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्या नियमित ट्विट करत असतात. मात्र, १० नोव्हेंबर पासून त्याच्या ट्विटर हँडलने मौन पाळले आहे. लतादीदी लवकरच बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरात प्रार्थना केल्या जात आहेत. आयसीयूत जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या लतादीदींसाठी त्यांची गायकी हीच त्यांच्यासाठी सध्या सर्वांत मोठी शक्ती बनली आहे. कुटुंब म्हणते, 'लता योद्धा आहेत' लतादीदींच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स हा संसर्ग कसा रोखता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जमेची बाजू म्हणजे दीदी या गायिका असल्याने त्यांची फुफ्फुसे मजबूत आहेत. यामुळेच अजूनही त्या आपल्या आजाराशी लढत आहेत. दीदींनी हजारो गाणी गायल्याचे जग जाणते. लतादीदी या एक योद्धा आहेत आणि त्या लवकरच घरी परततील असा विश्वास दीदींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. लता मंगेशकर यांच्या डाव्या व्हेंट्रिक्युलरमध्ये त्रास असून त्यांना न्यूमोनिया देखील झाला आहे, अशी माहिती इंटरनल मेडिसिन फिजिशियन डॉ. प्रतित समदानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दीदींची स्थिती नाजूक असली तरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा नक्कीच झाली आहे. डावी व्हेंट्रिक्युलर सर्वाधिक हृदयाच्या रक्त फेकण्याच्या शक्ती देण्याचे काम करतो आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी त्याची काम करणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत हृदयाच्या डाव्या हिश्श्याला अधिक काम करावे लागते. ब्रिच कँडी हॉस्पिटलने यापेक्षा अधिक माहिती दिलेली नाही. जेव्हा मोदींनी लतादीदींना केला फोन विविध भाषांमध्ये हजारो गाणी गाणाऱ्या लतादीदींनी या वर्षी 'सौगंध मुझे इस मिट्टी की' या चित्रपटासाठी शेवटचे गाणे रेकॉर्ड केले. हे गाणे ३० मार्चला प्रदर्शित झाले होते. दीदींना सन २००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे लतादीदींचा आवाज साऱ्या जगाने ऐकला. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीदींना फोनद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. ते बोलणे 'मन की बात' कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आले.