'सेक्युलर' शब्द घटनेतच आहे, चर्चा कसली?: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 21, 2019

'सेक्युलर' शब्द घटनेतच आहे, चर्चा कसली?: शिवसेना

https://ift.tt/2O8vcxa
नवी दिल्ली: 'या देशाची घटना सेक्युलर शब्दावर आधारित आहे, हे मान्य केल्यानंतर चर्चेचा प्रश्न येतोच कुठे? खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच न्यायालयात राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेण्याची भूमिका मांडली होती. त्यामुळं त्याबद्दल शिवसेनेला कुणी शिकवू नये,' अशा शब्दांत शिवसेना खासदार यांनी आज टीकाकारांना उत्तर दिलं.

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळं हिंदुत्वाचा हवाला देऊन शिवसेनेवर टीका केली जात आहे. शिवसेनेला काँग्रेसची धर्मनिरपेक्षता मान्य आहे का, असे प्रश्न प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विचारले जात आहेत. त्याविषयी आजच्या पत्रकार परिषदेत राऊत यांना विचारलं असता त्यांनी सेक्युलर शब्दाबद्दल आक्षेप असण्याचं काहीही कारण नसल्याचं स्पष्ट केलं. 'देशातील शेतकऱ्यांना मदत देताना त्यांचा धर्म पाहिला जात नाही. नोकऱ्या देताना उमेदवारांना त्यांचा धर्म विचारला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: तसा आदर्श घालून दिला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांनीही न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास विरोध केला होता. राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली जावी, असं त्यांनी म्हटल्याची आठवण राऊत यांनी यावेळी दिली. सोनियांना भेटण्याचं प्रयोजन नाही! शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेटी झाल्या आहेत. होत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट कधी होणार याबाबत विचारलं असता, 'सोनियांना इतक्यात भेटण्याचं काही प्रयोजन नाही. काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. हे नेते आमच्या व उद्धवजींच्या संपर्कात आहेत,' असं त्यांनी सांगितलं. असे आहे पक्षीय बलाबल नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक १०५ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.