अण्णाभाऊंचा 'फकिरा' साकारायचाय: कोल्हे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 4, 2019

अण्णाभाऊंचा 'फकिरा' साकारायचाय: कोल्हे

https://ift.tt/34Xhrrv
-विनय राऊळ 'आपल्याकडे आभाळाएवढं आहे, पण आपण सांगायला कमी पडतो.त्यामुळे हा वैभवशाली इतिबहास तरूण पिढीसमोर यायलाच हवा' हे म्हणणं आहे अभिनेता-निर्माते डॉ.अमोल कोल्हे यांच.,स्वराज्यजननी जिजामाता, या मालिकेच्या निमित्तांन त्यांच्याशी झालेल्या या गप्पा... ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका घेऊन येण्यामागे काय विचार आहे?- छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आणि शंभूराजेंच्या आजी म्हणून जिजामातांकडे पाहिलं जातं; पण जिजाऊ मांसाहेबांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व फारसं पुढे आलेलं नाही. स्वराज्यात असणारं नैतिक अधिष्ठान हे जिजामातांनी स्वराज्याला दिलं. जिजाऊंच्या जडणघडणीची गोष्ट समोर यायला हवी. एकीकडे आपण ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ असं म्हणतो. मात्र, साडेतीनशे वर्षांपूर्वी जे व्यक्तिमत्त्व आदर्श होतं त्यांची ओळख येणाऱ्या पिढीला व्हावी हा मोठा उद्देश यामागे आहे. येत्या काळात तुम्ही आणखीही काही ऐतिहासिक मालिका घेऊन येणार आहात असं कळतं... - होय, ज्यांचं टिचभर आहे त्यांचं वीतभर सांगतात. आपल्याकडे आभाळ भरून आहे; पण आपण सांगायला कमी पडतो. आपला इतिहास समोर येणं गरजेचं आहे. पुस्तकांमध्ये हे असलं तरी पुस्तकं वाचण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आपला इतिहास शुद्ध हेतूनं मांडला गेला, तर हा पुढच्या पिढ्यांसाठी फार मोठा ठेवा आहे. महाराष्ट्रातली महान व्यक्तिमत्त्वं हिंदी मालिकांच्या माध्यमातून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवीत, असं तुम्हाला वाटतं का? - हो नक्कीच; पण करमणुकीसाठी वाट्टेल ते, ही भूमिका अजूनतरी मराठी वाहिन्यांवर नाही. मराठी टेलिव्हीजनचं हे यश आहे. कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात आपण थोडं कमी पडत असू. हिंदी वाहिन्यांवर करमणुकीसाठी वाट्टेल ते पाहायला मिळतं. मराठीत मूळ इतिहासाशी आणि कथेशी प्रामाणिक राहणं हा विचार दिसतो. ‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि आता ‘जिजामाता’ या मालिकांमध्येही हे दिसतंय. कथा आणि इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा गुण हिंदी वाहिन्या कितपत स्वीकारतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे. अतिरंजित किंवा चुकीचा इतिहास दाखवू नये. अभिनेता, निर्माता, खासदार या सगळ्यात स्वतःला कसा वेळ देता? - थोडी धावपळ होतेय. कारण डेली सोप करताना वेळ ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट असते. विशेषतः ट्रोल नावाचे राक्षस आता आपल्याकडे आले आहेत. तुम्ही कधीही कोणत्याही गोष्टीवरून ट्रोल होऊ शकता; पण आपल्याकडे लोकांमध्ये याबाबत जागरूकता कमी आहे. मालिकेसाठी वेळ द्यावा लागतो. निर्माता म्हणून मी आणि माझी टीम माझ्यासोबत नेहमी असतेच. शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारताना काय विचार मनात असतो? - या दोन्ही भूमिका माझ्यासाठी वेगळ्या आहेत. या भूमिका करताना मी माझ्यातलं ‘स्विच्ड ऑफ’ आणि ‘स्विच्ड ऑन’ बटण सुरू ठेवतो. या व्यक्तिरेखा साकारताना खूप काळजीपूर्वक साकाराव्या लागतात. ज्या क्षणी तुमचा मेकअप उतरतो, त्यावेळी तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून वावरायला हवं. कोणत्या भूमिकेत सर्वाधिक रमता...अभिनेता, नेता की निर्माता? - मला वैविध्य आवडतं. निर्माता म्हणून तुम्ही वेगळं आव्हान घेता. नेता म्हणून असलेल्या आवश्यकता वेगळ्या असतात. मराठी चित्रपटसृष्टीतला मी असा एकमेव अभिनेता आहे ज्यानं राजकारणात काहीतरी करून दाखवलंय.