पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 4, 2019

पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना

https://ift.tt/2rNve53
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे शिल्पकार, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी आपल्या मोदीभेटीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचा धागा पकडत शिवसेनेच्या सामना या अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. 'पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असे निवडणूक प्रचारात सांगत होते. ही शंका अमित शहा यांना असेल, तर मग कोणत्या अनुभवानाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता?, पवार यांचा अनुभव देशासाठी कामी यावा यासाठी मोदी-शहा यांना साडेपाच वर्षे का लागली?, पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही', असा टोला लगावत, 'शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल', असा इशारा अग्रलेखात देण्यात आला आहे. 'शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे नाट्य' शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये किंवा शिवसेनेत्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ नये यासाठी पडद्यामागे जे भव्य नेपथ्य आणि दिग्दर्शन सुरू होते ते नाट्य शरद पवार यांनी समोर आणल्याचे सांगत सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मोदी यांनी शरद पवार यांनी दिलेली ऑफर पवार यनी धुडकावली असून काही झाले तरी शिवसेनेशी नाते तोडायचेच असाच याचा अर्थ असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे कुचकामाचे हिंदुत्व आहे. शिवसेनेला वाकवायचे, वाकले नाही तर दूर ढकलायचे हे धोरण आधीच ठरले होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे नाट्य तयारच होते, असे सांगत त्यासाठी शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा देशाला करून घेणाऱ्यांना ही उपरती आधी का झाली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याची भ्रष्ट तयारी भारतीय जनता पक्षाची होती आणि हा अनुभव देशाची जनता नव्याने घेत आहे असेही अग्रलेखात म्हटले आहे. साम, दाम, दंड, भेदांच्या पलीकडे काहीतरी चालले आहे आणि त्याचा स्फोट पवार यांनी केला तसा स्वतंत्र बाण्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी केला. तुमच्या राज्यात मोकळेपणाने बोलण्याचे, भयमुक्त जगण्याचे स्वातत्र्य राहिलेले नाही, असे राहुल बजाज यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना तोंडावर सांगितला असे सांगत शिवसेनेने स्वाभिमान दाखवला, पवार यांनी दबाव झुगारला आणि राहुल बजाज यांनी भय व झुंडीचे शास्त्र सांगितले आणि ही हिमतीची कामे महाराष्ट्रात झाली असे अग्रलेखात म्हटले आहे. अग्रलेखात आणखी काय म्हटले आहे- > मर्जीतले उद्योगपती आणि दलालांसाठी महाराष्ट्राला चरकात टाकून पिळण्याचे काम सुरू होते... हे पिळणे उद्धव ठाकरे यांनी थांबवले > असे अनुभव पुढेही येतील, दिल्लीने सवय ठेवली पाहिजे > शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा 'कावा' होता. > राज्यात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते