पंचांनी बाद दिल्यानंतरही पठाण उभाच राहिला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 13, 2019

पंचांनी बाद दिल्यानंतरही पठाण उभाच राहिला

https://ift.tt/2PhA181
बडोदा: २०१९-२०२० च्या पहिल्या सामन्यात बडोद्याचा ३०९ धावांनी धुव्वा उडवत मुंबईने आपल्या विजयी मोहिमेची सुरूवात केली. गुरुवारी, राऊंड १ च्या पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईने सहज विजय मिळवला. बडोदा संघापुढे विजयासाठी ५३४ धावांचे मोठे लक्ष्य होते. परंतु संपूर्ण संघ २२४ धावांवर बाद झाला. या सामन्यात क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित करणारी एक घटना घडली हे विशेष. ती घटना म्हणजे पंचाने बाद घोषित केल्यानंतर देखील बडोदाचा फलंदाज याने मैदान सोडण्यास नकार दिला. डावाच्या ४८ व्या षटकात शशांक आतरदेच्या चेंडूवर फॉरवर्ड शॉट लेगवर जय गोकुल बिस्ताने युसुफला झेलबाद केले. पंचांनी थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर पठाणला बाद घोषित केले. मात्र ३७ वर्षीय हा फलंदाज बाहेर न जाता सुमारे एक मिनिटभर मैदानावरच उभा राहिला. पंचांच्या निर्णयामुळे तो निराश झाला आणि त्याने निराशा व्यक्त देखील केली. यानंतर मुंबईचे ज्येष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेने मैदानाबाहेर जाण्यासाठी पठाणचे मन वळवले. तंबूकडे परतत असतानाही तो निराशेने डोके हलवत असल्याचे चित्र त्यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या विजयानंतर मुंबईला पूर्ण सहा गुण मिळाले आहेत. तर, बडोद्याच्या टीमने मात्र अजूनही खाते उघडलेले नाही.