...म्हणून भाजप नेत्यांची भेट घेतली: थोरात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 29, 2019

...म्हणून भाजप नेत्यांची भेट घेतली: थोरात

https://ift.tt/369lBgu
म. टा. वृत्तसेवा, संगमनेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाजपात प्रवेश करणार होते, असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केला होता. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या नेत्यांना मी हे सांगायला भेटलो होतो की, आमचे चांगले लोक तुमच्याकडे पाठवतो आणि तस घडलंही, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे. दोन वर्षांपूर्वी थोरात भाजप मध्ये जाण्याच्या विचारात होते, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी काल केला होता. त्यांना उत्तर देताना थोरात यांनी हा टोला लगावला आहे.राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मनातही काँग्रेस सोडण्याचा विचार आलेला नाही. काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत मी काम करत आलोय आणि यापुढेही करत राहणार आहे. सर्वांना काही स्वभाव माहिती असतात, त्यातून काही अंदाज बांधले जातात. आता सत्ता बदलली आहे, तर कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असावी, असे थोरात म्हणाले. वाचा: एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना थोरात आणि विखे यांना एकाच सोफ्यावर शेजारी बसण्याचा अनोखा प्रसंग घडला. संगमनेर तालुक्यातील विवाह सोहळा यासाठी निमित्त ठरलं आहे. संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या विवाहाला दोन्ही नेते एकाच वेळी दाखल झाले आणि बाळासाहेब थोरात यांनी चक्क राधाकृष्ण विखे यांना शेजारी बसवून घेतले. वाचा: