परराष्ट्र मंत्री खोट्या बातम्या पसरवत आहेत: गुहा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 14, 2020

परराष्ट्र मंत्री खोट्या बातम्या पसरवत आहेत: गुहा

https://ift.tt/2UOapTy
नवी दिल्ली: 'भारताचे पहिले पंतप्रधान यांना आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात सरदार बल्लभभाई पटेल नको होते', असे खोटे वृत्त पसरवणे हे परराष्ट्र मंत्री यांचे काम नसून हे काम त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी विभागाकडे सोपवावे, असा सल्लावजा टोला ज्येष्ठ यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लगावला आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या ट्विटवरून देशभरात चर्चा सुरू झालीय. जयशंकर यांच्यावर टीका होत असताना आता इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यात ट्विटयुद्धच झाले. व्ही. पी. मेनन यांच्या चरित्राच्या प्रकाशनानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे वादग्रस्त ट्विट केले. ते ट्विटमध्ये म्हणतात, ' हे १९४७च्या पहिल्या मंत्रिमंडळात सामील व्हावेत असे पंडित नेहरूंना वाटत नव्हते आणि त्यांनी त्यांचे नाव पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीतून वगळले. हा एक चर्चेचा मुद्दा आहे हे स्पष्टच आहे. लेखिका आपल्या खुलाशासह आपल्या मतावर ठाम आहे.' या मुद्द्यावरून इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हा निव्वळ एक भ्रम असल्याचे गुहा यांनी म्हटले आहे. हा भ्रम असून तो प्रोफेसर श्रीनाथ राघवन यांनी 'द प्रिंट'मध्ये लेख लिहून तो नष्टही करून टाकला आहे. तसे पाहिले असता भारताच्या उभारणीचे काम करणाऱ्या नेत्यांदरम्यान असलेल्या वादाबाबतच्या खोट्या बातम्या प्रमोट करणं हे काही परराष्ट्र मत्र्यांचं काम नाही. त्यांनी हे काम भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलवर सोडलं पाहिजे, अशा शब्दात गुहा यांनी परराष्ट्र मंत्र्यांना टोला हाणला आहे. गुहा यांच्या या ट्विटनंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही ट्विटद्वारे तत्काळ उत्तर दिले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'काही परराष्ट्र मंत्री पुस्तकांचं वाचन करतात. काही प्राध्यापकांसाठी देखील ही सवय चांगली ठरेल.' परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इतिहासकार गुहा यांच्यातील या ट्विटयुद्धात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही उडी घेतली. रमेश यांनीही नंतर ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ऑगस्ट १९४७ मध्ये पंडित नेहरू यांनी सरदार पटेल यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. या पत्रात पंडित नेहरू यांनी सरदार पटेलांना मंत्रिमंडळात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे. आपल्या मंत्रिमंडळातील पटेल हे सर्वात मजबूत खांब आहेत असा उल्लेखही नेहरू यांनी आपल्या पत्रात केल्याचे रमेश यांनी निदर्शनास आणून दिले आहे.