अर्थमंत्र्यांच्या ट्विटमुळे स्वराज यांची आठवण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 14, 2020

अर्थमंत्र्यांच्या ट्विटमुळे स्वराज यांची आठवण

https://ift.tt/2SESRGK
नवी दिल्ली: सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनतेचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात, हे प्रकर्षाने दाखवून दिलं ते मोदी मंत्रिमंडळातील दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी... आज अर्थमंत्री यांनी स्वराज यांच्या याच नीतीची ओळख पुन्हा एकदा प्रभावीपणे करून दिलीय. त्यामुळे, सामान्यांचे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना पण सरकारपर्यंत पोहचत असल्याचं दिसून येतंय. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्याला टॅग करणाऱ्या एका व्यक्तीच्या समस्येची लागलीच दखल घेत त्याला सोशल मीडियातूनच प्रत्यूत्तर दिलं. संजय पटेल नावाच्या एका लघू आणि मध्यम उद्योग व्यावसायिकानं अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांना टॅग करत, चार महिन्यांपूर्वीच कर्जाचे सगळे पैसे भरूनही 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया' आपल्या घराला मुक्त करत नसल्याची तक्रार केली होती. 'व्यावसाय कठिण परिस्थितीतून जात असताना आपली खासगी संपत्ती विकली. आमची मदत करा. आमच्या फॅक्टरीचं चांगलं मूल्य आहे' असं पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, 'हे ऐकून दु:ख झालं, अर्थ मंत्रालय लवकरच याबद्दल दखल घेईल' असं केलं. बाजारातली ढासळती परिस्थिती ध्यानात घेताना सरकार लहान व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. 'ईज ऑफ डुइंग बिजनेस'साठी अनेक पावलं उचलली जात आहेत. त्याचा, लहान उद्योगांना फायदा होऊ शकेल.