सरपंच निवड: महाविकास आघाडीला राज्यपालांचा धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 21, 2020

सरपंच निवड: महाविकास आघाडीला राज्यपालांचा धक्का

https://ift.tt/32eTGKX
मुंबई: थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय बदलण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेली शिफारस यांनी फेटाळली आहे. फडणवीस यांना आणखी एक दणका देण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा भाजपला झाला होता. मात्र, या निवड प्रक्रियेमुळे सरपंच एका विचारांचा आणि सदस्य इतर विचारांचे निवडून येत असल्यामुळे त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचा आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला होता. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आहेत. या सर्वांचा विकास कामांवर परिणाम होतो. जनतेतून होणारी थेट सरपंच निवडणूक रद्द करावी, अशी विधीमंडळाच्या अनेक सदस्यांनी मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करण्याबाबत सूतोवाच केले होते. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळानं फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्दबातल ठरवला होता. त्यासाठी अध्यादेश काढण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली होती. मात्र, ही शिफारस राज्यपालांनी फेटाळली असल्याचं समजतं. त्यामुळं नवा निर्णय राबवण्यासाठी आता सरकारला आगामी अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे. विधानसभेत विधेयक आणून हा निर्णय सरकारला लागू करता येणार आहे.