आमलकी एकादशीः महत्त्व, व्रत आणि पूजाविधी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 6, 2020

आमलकी एकादशीः महत्त्व, व्रत आणि पूजाविधी

https://ift.tt/2IqE3qq
फाल्गुन शुद्ध येणाऱ्या एकादशीला असे म्हटले जाते. आज, ६ मार्च रोजी आमलकी एकादशी आहे. पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही, त्यांनी आवळ्याचे सेवन केले पाहिजे. तसेच या एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केल्याने लाभ होतो, अशी मान्यता आहे. जाणून घेऊया आमलकी एकादशीचे व्रत आणि पूजाविधींबाबत... आमलकी एकादशीचे व्रत आमलकी एकादशीदिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा. दिवसभरात एकदाच फलाहार करावा. श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी. देवाचे आवाहन करून त्याचे पूजन करावे. हे व्रत करणाऱ्यांनी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. नैवेद्य दाखवावा. हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही. द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची समाप्ती समाप्ती करावी. आवळ्याच्या झाडाचे पूजन पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले जाते. आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा. या झाडाखाली कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूचे नामस्मरण करून पूजन करावे. कलशाला धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. तसेच आवळ्याचे सेवन करावे. शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होळीपासून होतो. ऋतूचक्र आणि निसर्गचक्र या काळात बदलते. शांत वातावरणात दाहकतेकडे जाणार असते. या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी, यासाठी आपल्याकडील व्रत, परंपरा, पूजन महत्त्वाचे आहेत. हा विष्णू देवाला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळत, अशी मान्यता आहे. तसेच आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोगिता अनन्य साधारण आहे. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे काही उपयोग आवळ्याचे सांगितले जातात. शंकर-पार्वतीचा संबंध भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते प्रथम येथे आले. म्हणून या दिवशी रंगभरनी एकादशी साजरी केली जाते. तेव्हापासून फाल्गुन शुद्ध एकादशी रंगभरनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण काशी गुलालमय होऊन जाते. विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.