राज्यात ४ वर्षांत ६००० सायबर गुन्हेगार जाळ्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 3, 2020

राज्यात ४ वर्षांत ६००० सायबर गुन्हेगार जाळ्यात

https://ift.tt/2wpvVng
मुंबई: मोबाइल, इंटरनेट, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या जितक्या झपाट्यानं वाढत आहे, तितक्यात वेगानं सायबर गुन्ह्यांत वाढ होत आहे. २०१५ ते २०१९ या चार वर्षांच्या कालावधीत सायबर गुन्ह्यांत सहा हजारांहून अधिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. राज्यात गेल्या चार वर्षांत १६५१५ सायबर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणांत ६ हजार २० जणांना अटक करण्यात आली. तर ४ हजार ५३२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली. ३ हजार २५३ पोलीस कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सायबर पोलीस ठाण्यांना आधुनिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पुरवण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तुरुंगांमध्ये क्षमतेहून अधिक कैदी राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत आणि कैद्यांना या तुरुंगांमध्ये झोपण्यासाठीही पुरेशी जागा नाही, अशी माहिती देशमुख यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. तुरुंगांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यानं २ हजार १९३ कैदी त्वचारोगानं ग्रस्त आहेत. पुण्यातील येरवडा तुरुंगाची क्षमता २ हजार ४४९ कैद्यांची आहे, या तुरुंगात आठ नव्या बराकी बांधण्यात येत आहेत. येरवडा तुरुंगात जागेची कमतरता नाही. कारण हा ३२० एकरचा परिसर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.